Nawab Malik
Nawab Malik  sakal media
महाराष्ट्र

सगळ्यात जास्त दारु पिणारे भाजपमध्येच; नवाब मलिकांची टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्रात राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्यात येत असल्याचं भाजपने म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी बोलताना सुपरमार्केटमध्ये वाईन उपलब्ध करण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाचं समर्थन करत भाजपवर टीका केली आहे. सर्वांत जास्त दारु पिणारे लोक हे भाजपमध्येच असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच ज्या भाजप नेत्यांचे वाईन शॉप, कारखाने आहेत, त्यांनी ते बंद करावेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक म्हणाले की, भाजपच्या नेत्यांचे वाईन शॉप आहेत. भाजपच्या काही माजी मंत्र्यांचे बार आहेत त्याचे आधी परवाने रद्द करा. एवढा दारुचा तिटकारा असेल तर ते कारखाने बंद करावेत. भाजप कार्यकर्त्यांनीही दारु पिऊ नये. भाजप नेत्यांनी शपथ घेतली पाहिजे की आता दारू पिणार नाही.

पुढे ते म्हणाले की, सर्वांत जास्त दारु पिणारे लोक भाजपमध्येच आहेत. मध्यप्रदेश हा मद्यप्रदेश झाला आहे. त्याठिकाणी तर होम बारचा निर्णय होतोय. सर्वांत कमी दारुची दुकाने असलेलं राज्य महाराष्ट्र आहे. या राज्यातील विरोधी पक्षातल्या नेत्यांनी शेजारच्या राज्यातील नेत्यांना जाऊन भेटून यावर भाष्य केलं पाहिजे.

नितेश राणेंच्या अटकेबाबत म्हणतात...

नितेश राणेंवर खुनाच्या प्रयत्नाची केस दाखल झाल्यानंतर ते न्यायालयात गेले आहेत. त्यांनी अटक होऊ नये म्हणून शक्य ते सगळे प्रयत्न करुन पाहिले आहेत. सरतेशेवटी त्यांना आता न्यायालयाच्या आदेशाने अटक झाली आहे. भाजप नेते म्हणतात न्यायालय सरकारच्या दडपशाहीने चालते आहेत पण ते बोलणे योग्य नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT