CT RAVI
CT RAVI google
महाराष्ट्र

हिम्मत असेल तर विधानसभा विसर्जित करून निवडणुका घ्या, भाजप नेत्याचं आव्हान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत. राज्याला देवेंद्र फडणवीसांसारखा (Devendra Fadnavis) फुलटाईम मुख्यमंत्री हवाय. हिंम्मत असेल तर विधानसभा विसर्जित करा आणि पुन्हा निवडणुका घ्या. कोण जिंकेल ते कळेलच, असं आव्हान भाजपचे प्रदेश प्रभारी सी. टी. रवी यांनी दिले आहे. तसेच त्यांनी शिवसेनेवर देखील टीका केली आहे.

राज्यातील मुख्यमंत्री किती वाजता उठतात काय करतात हे जनतेला माहिती आहे. हिंदूत्व सोडून आता शिवसेना परिवार पार्टी झाली आहे. जनतेने नरेंद्र मोदी आणि फडणवीसांमुळे २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेला मत दिले आहे. शिवसेनेने भाजपला धोका नाहीतर जनतेला धोका दिला आहे. दुसऱ्या पक्षासोबत सरकार बनवून जनतेला धोका दिला आहे. शिवसेना फक्त परिवार वाढविण्याचे काम करत आहे, असा घणाघाती आरोप देखील रवी यांनी केला आहे.

शिवसेनेचे प्रत्युत्तर -

सीटी रवी यांचं भाषण अतिशय भंपकपणाचं होतं. यांना लोक हसतील. राजकारणाचा कुठलाही काही संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. पार्ट टाईम आणि फुल टाईम मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीत असेल. अशी संकल्पना देशात कुठेही नाही, असं प्रत्युत्तर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी दिलं.

प्रत्येकवेळी यांचा शिवसेनेवर राग का? प्रत्येकवेळी भाजपने सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजपला प्रत्येकवेळी मुख्यमंत्री पद हवं आहे. हिंदूहृदयसम्राटांचा हात पकडून हे राजकारणात आले. मग कसल्या धोकाधडीच्या गोष्ट करतात. कुठल्या तोंडाने महाराष्ट्रात येतात? तुम्ही युती होण्यापूर्वीच्या गोष्टी पाळल्या नाहीत. मग शिवसेना तुमच्यामागे धावणार आहे का? असा सवाल देखील कायंदे यांनी यावेळी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT