BJP MP Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

फडणवीस, बावनकुळेंना मी तलवार-वाघनख दिलंय, कारण शिवरायांनी..; काँग्रेसवर हल्ला करत काय म्हणाले उदयनराजे?

लोकशाहीत काँग्रेसने (Congress) देशाला गेली ७० वर्षे प्रगतीपासून व विकासापासून वंचित ठेवले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सातारा : लोकशाहीत काँग्रेसने (Congress) देशाला गेली ७० वर्षे प्रगतीपासून व विकासापासून वंचित ठेवले आहे. महात्मा गांधींनी सत्तेचे विकेंद्रीकरण करा, असा संदेश दिला होता; परंतु तो संदेश फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित ठेवण्याचे काम काँग्रेसने केले आहे, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केला आहे.

दरम्यान, २०२४ च्या निवडणुकांत भाजप, शिंदे गट आणि अजितदादा राष्ट्रवादी मिळून विधानसभेच्या २८८ जागा आणि लोकसभेला ४८ जागा मिळवू, असा दावा करत त्यांनी नेहमीच्या स्टाईलने कॉलर उडवली. सातारा लोकसभा मतदारसंघातील (Satara Loksabha Constituency) भाजपच्या टिफीन बैठकीत खासदार भोसले बोलत होते.

या वेळी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, सुरभी भोसले, सुनील काटकर आदी उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, ‘‘२०२४ च्या निवडणुकीत देशात पुन्हा भाजप येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे, राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोचवणे गरजेचे आहे. या निवडणुकीत राज्यात २८८ आमदार आणि ४८ खासदार भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट मिळून निवडून आणणार आहोत.

राज्यातील ७० टक्के लोक भाजपच्या बाजूने आहेत. त्यामुळे आपण महाविजय मिळवणारच. देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आदींना मी तलवार आणि वाघनख भेट दिलेले आहेत. कारण शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानेच स्वराज्य उभे केले आहे आणि या पद्धतीने आपले सरकार उभे राहिले पाहिजे.

यासाठीच मी त्यांना भेटलो आहे. आगामी निवडणुका एकसंधपणे लढवून लोकसभा व विधानसभा निवडणुकांत भाजपचे उमेदवार निवडून आणले पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या विकास योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोचायला हव्यात, असं उदयनराजेंनी स्पष्ट केलं.

जयकुमार गोरे म्हणाले, ‘‘खासदार उदयनराजे भोसले हे जिल्ह्याच्या नाही तर राज्यपातळीवर कार्यरत दिसले पाहिजेत. ते मला आज दिसत आहेत. त्यामुळे मी आज खूप आनंदी आहे. या राज्यात फक्त छत्रपतींचा आदेश चालतो. त्याच छत्रपतींच्या वारसदारांनी आजच्या टिफीन बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीस महत्त्व आले आहे.’’ या वेळी सुरभी भोसले, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, विक्रम पावस्कर आदींनी मार्गदर्शन केले.

कांदा फोडून जेवण अन् उडवली कॉलर...

टिफीन बैठकीला खासदार उदयनराजे यांनी एका बुक्कीत कांदा फोडून जेवण सुरू केले, तर नेहमीप्रमाणे भाषणात कॉलर उडवली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘माझी कॉलर, माझा शर्ट, मी उडवली कॉलर.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT