Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Uddhav Thackeray vs Eknath Shinde esakal
महाराष्ट्र

शिंदेंच्या बंडखोरीमागं भाजपच; उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्यानं एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई : निवडणूक आयोगानं (Election Commission of India) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि शिवसेनेतून बंडखोरी करणार्‍या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला नोटीस पाठवलीय. दोघांनाही बहुमत (Majority) सिद्ध करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिलेत. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला बहुमत सिद्ध करण्यासाठी संबंधित पुरावे मागितले असून या प्रकरणी आता 8 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

याच दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्यानं एक मोठा गौप्यस्फोट केलाय. वर्षावर एकनाथ शिंदे यांना बोलावलं, मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचं असेल तर मी पायउतार होतो असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या घटनेला आदित्य ठाकरे साक्षीदार होते. शिंदेंच्या राजकीय हालचालीची माहिती उद्धव ठाकरेंना होती. आमदारांना माझ्यासमोर आणा, आपण चर्चेतून मार्ग काढू असं उद्धव ठाकरेंनी शिंदेंना कळवलं. परंतु, विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आमदारांनी सूरत, गुवाहाटी गोवा प्रवास सुरू केला असा खुलासा शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी केलाय.

'आमदारांना भाजपासोबत जायचं आहे'

हर्षल प्रधान (Harshal Pradhan) म्हणाले, मुख्यमंत्रिपदावर असलेल्या माणसाला प्रत्येक राजकीय व्यक्तीच्या हालचालीची माहिती असते. अख्खं पोलीस विभाग ही माहिती पुरवत असतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना काय प्रॉब्लेम आहे? असं विचारलं. तर आमदारांना भाजपासोबत जायचं आहे असं ते म्हणाले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी ज्यांना भाजपासोबत जायचं आहे त्यांना माझ्यासमोर आणा, मी सगळ्यांशी बोलतो. त्यावर चर्चा करून मार्ग काढू असंही उद्धव ठाकरेंनी शिंदे यांना सांगितलं होतं. तेव्हा ठीक आहे मी घेऊन येतो, असं शिंदेंनी म्हटलं. परंतु, त्यानंतर त्यांनी आमदारांना घेऊन सूरत, गुवाहाटी गाठलं, असंही त्यांनी सांगितलं. न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत प्रधान बोलत होते.

'भाजपाला शिवसेना संपवायची आहे'

शिवसेना पक्षात बंडखोरी होणं, ही भारतीय जनता पार्टीची स्क्रिप्ट आहे, असं खळबळजनक विधानही प्रधान यांनी केलंय. ते पुढं म्हणाले, शिवसेना पक्षात बंडखोरी होणं, ही भारतीय जनता पार्टीची स्क्रिप्ट आहे. हे उद्धव ठाकरेंनी वारंवार सांगितलंय. भाजपाला शिवसेना संपवायची आहे. त्यांना तुम्हाला (बंडखोर आमदारांना) मोठं करायचं नाहीय. आज ते तुमचा वापर करून घेत आहेत. आम्ही शिवसैनिकाला मुख्यमंत्री केला, हे भाजपाला भासवून द्यायचं आहे. मूळात हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं असल्यानं त्यांना शिंदे गटाचा मुख्यमंत्री करावा लागला. ही भारतीय जनता पार्टीनं लिहिलेली स्क्रिप्ट आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारे राजकीय उलथापालथ झाल्याने शिवसेना कमजोर झाली नाही, असंही प्रधान यांनी स्पष्ट केलं.

सुहास कांदेला शिवसेनेनं ओळख दिली

सत्ता मिळत नव्हती म्हणून उद्धव ठाकरेंच्या हातून सत्ता भाजपानं ओरबडून घेतली. राज्यावर 6 लाख कोटींचं कर्ज आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट होती तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्याची आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न केला. अडीच वर्षाच्या पूर्ण कालावधीत देशातला नंबर वन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा गौरव केला हे काहींना पाहावलं नाही. नेमकं काय चुकलं? या अवस्थेत महाराष्ट्र उभा आहे. बंडखोरांना काय देण्यात कमी पडलं? शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे. ज्यांना शिवसेना माहिती नाही ते आता बोलत आहे. सुहास कांदेला ओळख शिवसेनेनं दिली. भुजबळ पालकमंत्री असताना सुहास कांदे यांनी त्यांच्याविरोधात काम केलं, असंही त्यांनी सांगितलं.

याआधीही शिवसेनेत 2-3 वेळा बंडखोरीचा प्रयत्न

प्रधान म्हणाले, भाजपानं एकाच वेळी 40 जणांची दिशाभूल केलीय. भाजपाच्या स्क्रिप्टला मान्य करून तेही त्यांच्यासोबत फरफटत गेले आहेत. कारण, आजही त्यांच्या मनात शिवसेनेबद्दल आपुलकी आहे. ते आजही म्हणतात आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसैनिकांच्या बंडखोरीमुळं ठाकरे कुटुंब मनातून दुखावलं आहे. शिवसेनेत याआधीही २ ते ३ वेळा बंडखोरीचा प्रयत्न झाला असल्याच्या प्रश्नाला प्रधान यांनी दुजोरा दिलाय. ही बाब उद्धव ठाकरेंच्या कानावर घातल्याचंही प्रधान यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT