rain
rain 
महाराष्ट्र

केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार राज्याच्या दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अवकाळी पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणची पिके वाहून गेली आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणे अवघड बनले आहे. यासाठी राज्यातील अनेक नेत्यांनी केंद्र सरकारकडे मदत करण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर नुकसानीचा आढावा केंद्रीय पथक शुक्रवारपासून (ता. 22) तीन दिवस घेणार आहे. 

ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक या विभागांना बसला आहे. विदर्भातील कापूस, सोयाबीन या पिकांचेही नुकसान झाले आहे. केंद्राचे पाच सदस्यांचे पथक तीन दिवसांच्या काळात विविध भागांत भेटी देतील, तसेच शेतकऱ्यांशीही चर्चा करतील. डॉ. व्ही. तिरुपुगल हे या पथकाचे नेतृत्व करतील. 

राज्यातील 94 हजार 53 हजार 139 हेक्‍टर क्षेत्राला पावसाचा फटका बसला आहे. यामुळे एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत राज्याने केंद्राकडे 7,207 कोटी रुपयांची मागणी केली आहे. राज्यपालांनी नुकतीच खरिपासाठी हेक्‍टरी आठ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT