चंद्रकांत पाटील इसकाळ
महाराष्ट्र बातम्या

'कारवाईच्या भीतीने काहीजण आत्ताच आत्महत्येची धमकी देऊ लागलेत'

ईमानदारी और सच्चाई का डर अच्छा है, ये डर होना जरुरी है; चंद्रकांत पाटलांचा टोमणा

सकाळ डिजिटल टीम

ईमानदारी और सच्चाई का डर अच्छा है, ये डर होना जरुरी है; चंद्रकांत पाटलांचा टोमणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेना असा वाद चिघळला आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा भाजपचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला आहे. आपल्या कुकर्मांमुळे कधीतरी आपल्यावर कारवाई होईल या भीतीने काहीजण आत्ताच आत्महत्येची धमकी देऊ लागलेत, असा टोमणा त्यांनी मारला आहे. आता त्यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आलं आहे.

मागील काही दिवसांपासून ठाकरे सरकारमधील (Thackeray Govt.) अनेक नेत्यांवर ईडी आणि आयटीच्या छापेमारीची कारवाई सुरु आहे. यामध्ये शिवसेना नेत्यांची नाव समोर आली आहेत. याशिवाय मुख्यमंत्री ठाकरे यांचे बऱ्याच निकटवर्तीयांचा यात सहभाग असल्याचे दिसत आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी बोचरी टीका केली आहे. आपल्यावरही ईडीची (ED) कारवाई होईल या भीतीने काहीजण आत्ताच आत्महत्येची धमकी देऊ लागले. इमानदारी आणि खऱ्याची भीती चांगली आहे. आणि याची भिती असलीच पाहिजे, असे ट्विट करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.

आव्हाडांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ईडीच्या कारवाईसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की नुसतं चौकशीला बोलवलं तरी, माझी मुलगी आत्महत्या करेल. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, "जितेंद्र आव्हाड भावनिक आहेत. मी समजू शकते अशा गोष्टींच्या एका वडिलाला काय वेदना होतात. कुटूंबावर आरोप प्रत्यारोप करण्याची कधीच महाराष्ट्राच्या राजकारणात पध्दत नव्हती. हे सर्व दुर्दैवी आहे. शरद पवार हे ५५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, आजपर्यंत त्यांनी कुणावर कोणतेही आरोप केलेला नाही, असे ही त्या म्हणाल्या. (Supriya Sule)

सदाभाऊ खोत यांची आव्हाडांवर टीका म्हणाले,

सदाभाऊ खोत यांनी आव्हाडांचे वक्तव्य ट्वीट करत त्यांच्यावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, “हा जिजाऊ आणि शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आमच्या मुली इथेच मोठ्या होतील. हिजाब आणि बुरखा घालून फिरणाऱ्या इतर राज्यात आपण आपली मुलगी पाठवणार आहात का? असा सवाल सदाभाऊंनी केला होता. त्यावर आव्हाडांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “शिवरायांनी धाडसी राजकारण केले शत्रू च्या बायका मुलं मुलिंना छळले नाही.. उगाच त्यांचा कारभार आणि त्यांना बदनाम करू नका तशी शिकवण जिजाऊंची होती. राज्यपाल जेव्हा छत्रपतीं बद्दल बोलले तेव्हा कुठे होतात.

'माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही’, असे वक्तव्य आपण बोलले नसल्याचे जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलं. मात्र तरीसुध्दा या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून विरोधक आव्हाडांवर टीका करताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT