Imtiaz Jaleel  esakal
महाराष्ट्र बातम्या

Imtiaz Jaleel : दंगल घडत होती, तेव्हा पोलीस कुठे होते? इम्तियाज जलील यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

किराडपुरा भागात रात्री झालेल्या राड्यात एकूण 15 गाड्यांचं नुकसान करण्यात आलं आहे.

Balkrishna Madhale

ही दंगल थांबवण्यात पोलीस कमी पडली आहेत, असं माझं ठाम मत आहे. मी प्रश्न विचारु इच्छितो, दंगल घडत होती, तेव्हा त्या रात्री पोलीस कुठे होते.

छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar Violence) किराडपुरा भागात बुधवारी मध्यरात्री तणाव निर्माण झाला होता. रामनवमीच्या (Ram Navami) पार्श्वभूमीवर, राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या घोळक्यानं उत्सवासाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली.

पाहता-पाहता घटनेनं रौद्ररूप धारण केलं. पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 400 ते 500 लोकांवर गुन्हे दाखल केला. शहरातील जिन्सी पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयरनुसार, किराडपुरा भागात रात्री झालेल्या राड्यात एकूण 15 गाड्यांचं नुकसान करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांवर आरोप केलाय.

माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले, ही दंगल थांबवण्यात पोलीस कमी पडली आहेत, असं माझं ठाम मत आहे. मी प्रश्न विचारु इच्छितो, दंगल घडत होती, तेव्हा त्या रात्री पोलीस कुठे होते. 13 गाड्या जाळल्या जात होत्या, तेव्हा पोलीस कुठे होते. फक्त 15 पोलिसवाले ही दंगल थांबवणार होते का? असा सवाल त्यांनी केलाय.

शहरात शंभर कोटींपेक्षा जास्त पैसे खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, त्या सीसीटीव्ही फूटेजमधील दंगल महाराष्ट्राला, देशाला दाखवा. मी कोणाकडं बोट दाखवत नाहीये आणि कोणावर आरोपही करत नाही. पण, पोलिसांनी आणि सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी मागणी करावी की, हायकोर्टाच्या माध्यमातून याची चौकशी करावी. माझा या सरकावर विश्वास राहिला नाही. दंगल थांबवण्याची जबाबदारी तुमच्यावर दिली होती, पण ती तुम्ही थांबवू शकला नाही, असा घणाघातही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rules: EMI भरला नाही तर मोबाइल लॉक होणार? RBI चा नवा नियम काय सांगतो? पाहा

Ajinkya Rahane New Journey: निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! म्हणाला, क्रिकेटने मला भरपूर काही दिलं, आता...

Kas Plateau Flower Season : कास तलाव ते वजराई धबधबा! वीकेंडला साताऱ्यात पर्यटकांची पसंती; 'चवर' फुलांनी बहरलं पुष्प पठार, हंगाम कधी होणार सुरु?

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागणार नाही - मुख्यमंत्री

Health Tips: सतत ब्लड टेस्ट करताय? अनावश्यक रक्त चाचण्यांमुळे वाढतोय ॲनिमिया आणि मानसिक तणाव!

SCROLL FOR NEXT