chhatrapati sambhajiraje is said be out raigad authority committee
chhatrapati sambhajiraje is said be out raigad authority committee 
महाराष्ट्र

तर वेगळा विचार करावा लागेल; मनमानीला कंटाळलेल्या संभाजीराजेंचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

रायगड : रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात खाबूगिरी आणि बाबूगिरीचा शिरकाव झाल्याचा आरोप खुद्द रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. खा. संभाजीराजे छत्रपती रायगडावर आहेत. रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर त्यांनी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

संभाजीराजे म्हणाले, प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जाणारी कामे पुरातत्व विभागाकडून रोखली जात आहेत. महाड ते पाचाड मार्गाच्या कामात टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी केली. यांसदर्भात संबधित विभागांशी पुराव्यासह पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे वेळीच सुधारले नाहीतर आपल्याला वेगळा विचार करावा लागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

रामदास आठवलेंना सरंसंघचालकांचे म्हणणे अमान्य 

किल्ल्याच्या संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाने करायचे, तर इतर काम प्राधिकरणाच्या विशेष विभागाने करायचे असे दिल्ली येथे प्रधानमंत्री कार्यालयातील बैठकीत ठरले होते. त्यानुसार, काही कामे प्राधिकरणाने सुरु केली होती. मात्र पुरातत्व विभागाने ती थांबवली. हे चुकीचे आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले. खा. संभाजीराजे छत्रपती या भ्रष्टाचाराला आणि मनमानीला कंटाळले असून ते रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT