महाराष्ट्र बातम्या

सनदी अधिकाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट दुर्लभ!

प्रशांत बारसिंग

मुंबई: देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महत्त्वाची पदे उपभोगल्यावर सुमारे डझनभर ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुन्हा पूर्ण ताबा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची आडकाठी होत आहे.

अन्य कोणी अधिकारी ठाकरे यांना भेटण्यासाठी येणार असेल, तर त्यापूर्वीच यातील एक अतिवरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन काही विषयांवरील चर्चा करत वेळ मारून नेत असल्याने भेटावयास गेलेला अधिकारी हात हलवत माघारी फिरत असल्याची माहिती ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याने दिली.

राज्याचा गाडा आपल्या इच्छेनुसार आणि तांत्रिक बाबींच्या माहितीच्या आधारे हाकता यावा, अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा असते. याच धर्तीवर सन २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील अनेक अधिकाऱ्यांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्‍ती केली. यात मुख्य सचिवांपासून मुख्यमंत्री कार्यालयातील अपरमुख्य सचिव, प्रधान सचिव आणि मंत्रालयातील अन्य प्रधान सचिव, मुंबई आणि ठाणे महापालिका आयुक्‍त, नगरविकास विभाग - २, महसूल, वित्त विभाग, गृह, सामान्य प्रशासन, एमएमआरडीए, म्हाडा, गृहनिर्माण, राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई, मुंबई उपनगर तसेच पुणे, नाशिक, नागपूरसारख्या मोठ्या शहरांचे पालिका आयुक्‍त अशा नियुक्‍त्या फडणवीस यांनी केल्या होत्या. विशेष म्हणजे जी पदे आयएएस अधिकाऱ्यांची आहेत, अशा पदांवरही फडणवीस यांनी आयपीएस आणि केंद्रीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांची वर्णी लावली आहे.

आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यामुळे मंत्रालयासह राज्यातील महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित असताना याच अधिकाऱ्यांनी ठाकरे यांचा  ताबा घेतल्याने बदल्या रखडल्याचे समजते.

‘आधीचे मुख्यमंत्री आपणांस योग्य पोस्टिंग देत नव्हते. मनासारखे काम करू देत नव्हते’, अशी कारणे सांगून हे अधिकारी उद्धव ठाकरे यांचा विश्‍वास संपादन करत आहेत. या अधिकाऱ्यांनी जोरदार लॉबिंग केल्याने अन्य ज्येष्ठ अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची भेट दुरापास्त झाल्याचे सांगण्यात आले.

 एखाद्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावयाची असल्यास त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाला कळवावे लागते. हे अधिकारी येणार असल्ल्याचे समजताच काही अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन बसत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

वेळ मारून नेण्याचे प्रयत्न
जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची असते, नेमके त्याच वेळी या ठरावीक अधिकाऱ्यांपैकी एखादा अधिकारी आपल्याकडील एखादी फाइल घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी जातात आणि त्या ठिकाणी वेळ लावतात. त्यामुळे वेळ घेऊन भेटायला आलेला अधिकारी वाट पाहून भेट न घेताच परतल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rafiq Sheikh: रविंद्र धंगेकराच्या आरोपांवर थेट प्रत्युत्तर; रफिक शेख कोण? संपूर्ण माहिती आली समोर

INDIA A SQUAD FOR ODI SERIES vs SOUTH AFRICA A : रोहित शर्मा, विराट कोहली यांचा वन डे संघात समावेश नाही; तिलक वर्माकडे नेतृत्व, तर ऋतुराज उप कर्णधार...

Mhada Lottery: पुण्यात ९० लाखांचे घर फक्त २८ लाखांत मिळणार! म्हाडाची मोठी घोषणा; अर्ज कधी आणि कसा करायचा?

Jalgaon News : जळगावकरांची प्रतीक्षा वाढली; अवकाळी पावसामुळे ई-बस आगाराचे काम रखडले, नवीन वर्षातच बससेवा सुरू होणार

Latest Marathi News Live Update : रेशनवर मिळालेले खराब धान्य शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दाखवले

SCROLL FOR NEXT