महाराष्ट्र

'नागरिकांनी काळजी करु नये, सरकार सर्वोतोपरी मदत करणार'

विनायक होगाडे

रायगड : दुर्घटनाग्रस्त तळये गावांत मुख्यमंत्र्यांनी दौरा केला. त्यांनी या भागात पाहणी करुन माध्यमांशी संवाद साधलाय. त्यांनी म्हटलंय की, ज्याला आक्रित म्हणावं ते आक्रित घडतंय. या घटनांमधून आपल्या शहाणं होण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत पावसाळा चक्रीवादळानेच सुरु होतो. त्यामुळे हा अनुभव पाहता ज्या ज्या ठिकाणी अशा वस्त्या आहेत, त्यांचं पुनर्वसन करण्यसंदर्भात लवकरच आराखडा तयार करु. जेणेकरुन ही परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही. या गोष्टी लक्षात घेऊन नियोजन करु. सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण परिसरात झालेला संहार पाहता पाण्याचं नियोजन करायला हवं. त्याचं व्यवस्थापन करण्याची गरज आहे. सरकार त्यावर काम करतंय. गावकऱ्यांनी काळजी करु नये. त्यांना नुकसानभरपाई दिली जाईल.

यापुढे अशा दुर्घटना घडून नयेत आणि घडल्या तर त्यात जीवित हानी होऊ नये, याची काळजी घेऊ. सगळ्या केंद्रीय यंत्रणांकडून आवश्यक ती मदत मिळतेय. बऱ्याच ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर आपण केलं आहे, आणखी जिथे गरज आहे, त्यांचंही करु. पावसाचा परिणाम आणि प्रमाण कुणीही ठरवू शकत नाही नागरिकांनी काळजी करु नये, सरकार सगळी मदत करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड तालुक्यातील तळोई येथील दुर्घटनाभागाची पाहणी केली. त्यानंतर गंभीर पूरस्थितीचा सामना करण्यासाठी रायगड व रत्नागिरीसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तर अन्य जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. राज्यात मागील पाच दिवसांत पावासाने हाहा:कार माजवला असून अनेकांचा संसार उद्धवस्त झाला आहे. कोकण-प. महाराष्ट्र पावसामुळे जायबंदी झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT