Uddhav Thackeray sakal media
महाराष्ट्र बातम्या

रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करणार - मुख्यमंत्री

कृष्ण जोशी

मुंबई : अतीवृष्टीमुळे (heavy rainfall) अडचणीत आलेल्या रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना (mango production) दिलासा मिळण्यासाठी त्यांच्या पीक कर्जाचे (loan) पुनर्गठन करण्याबाबत शासन सकारात्मक (government) निर्णय घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनी येथे दिले.

अवकाळी पावसामुळे हे शेतकरी अडचणीत आले असल्याने त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मार्ग काढण्यात येईल. या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन होण्यासाठी सहकार विभागाबरोबर बैठक घेऊन शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला कृषीमंत्री दादाजी भुसे, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे व त्यापूर्वीची चार वर्षे निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. तरीही कर्जवसुलीसाठी बँका तगादा लावीत आहेत. सन 2014-15 मधील अवकाळी पावसाच्यावेळी शासनाने या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे तीन महिन्यांचे व्याज माफ केले होते. पण ती रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा झाली नाही. पुनर्गठित कर्ज रकमेवरील पहिल्या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षाचे सहा टक्के प्रमाणे व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. शेतकऱ्यांकडून मात्र बँकांनी वसुली केली आहे. त्यामुळे पीककर्ज पुनर्गठन प्रक्रिया होणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी दाखवून दिले.

आंबा पिकावरील फवारल्या जाणाऱ्या कीटक नाशकाला जीएसटीमध्ये सवलत मिळण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. अवकाळी पाऊस पंधरा मे पर्यंत पडला तरच विमा रक्कम मिळते. पण कोकणातील आंबा हंगाम मे अखेरपर्यंत सुरु असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत नाही. त्यामुळे ही तारीखही 31 मे पर्यंत वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT