Prithviraj Chavan vs Prakash Ambedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Prithviraj Chavan : 'वंचित'मुळे काँग्रेसचे अनेक खासदार पडले आणि त्याचा भाजपला फायदा झाला; चव्हाणांचा आंबेडकरांवर गंभीर आरोप

'संभाजी भिडेसारखा माणूस समाजात विष कालवत सुटलाय'

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकातील भाजपचा पराभव त्यांना सहन होत नाही. छत्तीसगड, राजस्थानमध्ये भाजप पराभव नक्की आहे.

सातारा : सध्याच्या सरकारमध्ये एक वाक्यता नसून चोऱ्या लपविण्यासाठी शिंदे, पवार गट सत्तेत गेला आहे. याबाबत लोकांच्या मनात चीड आहे. पाठीत खंजीर खुपसून ते सत्तेत सहभागी झाले आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष (Congress) मोठा असल्याने पदाधिकाऱ्यांनी आता जनतेपर्यंत पोचावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस भवनात जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा निरीक्षक श्रीरंग चव्हाण, ज्येष्ठ नेते उदयसिंह पाटील, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, नरेश देसाई, राजेंद्र शेलार, ॲड. विजयराव कणसे, धनश्री महाडिक, रजनी पवार आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, ‘‘राज्यातील सध्याच्या परिस्थितीला भाजप जबाबदार आहे. अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते. त्या वेळी काँग्रेस छोटा पक्ष होता. आता परिस्थिती बदलली आहे. सत्तांतर झाले असून, महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र महत्त्वाचे राज्य आहे.

महाविकास आघाडी एकत्र लढली, तर भाजप हरणार हे नक्की आहे. कर्नाटकातील भाजपचा पराभव त्यांना सहन होत नाही. छत्तीसगड, राजस्थानमध्ये भाजप पराभव नक्की आहे. भाजपला महाराष्ट्र पाहिजे असल्यामुळे अमित शाह यांनी शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादी फोडली. भाजपविरोधात काँग्रेस लढणार आहे.

राज्यात वंचितमुळे अनेक ठिकाणी खासदार पडले आणि भाजपला त्याचा फायदा झाला आहे. राज्यातीलही राजकीय परिस्थिती समजून सांगण्यासाठी सध्या चांगली परिस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत पोचावे. भाजपला नवी व्यवस्था स्थापन करायची असून, संभाजी भिडेसारखा माणूस समाजात विष कालवत सुटला असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सुरेश जाधव म्हणाले, की जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती माण, खटाव, फलटण व कोरेगाव याठिकाणी टँकर आणि चारा छावणींची गरज असून, यासाठी काँग्रेस लक्ष वेधणार आहे. संभाजी भिडे हे समाजातील वातावरण दूषित करत आहेत. सरकारचा कांदा निर्यात निर्णय योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस निवास थोरात, प्रताप देशमुख, जाकिर पठाण, बाबासाहेब कदम, संदीप चव्हाण आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT