Prithviraj Chavan vs Modi Government
Prithviraj Chavan vs Modi Government esakal
महाराष्ट्र

देशात हुकुमशाही पध्दतीनं कारभार सुरू; माजी मुख्यमंत्र्यांची मोदी सरकारवर टीका

सकाळ डिजिटल टीम

'देश चुकीच्या लोकांच्या हातात असून हुकुमशाही पध्दतीनं कारभार सुरू आहे.'

Prithviraj Chavan : सध्या देशात महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सरकारविरोधात काँग्रेस वेळोवेळी आंदोलन करताना दिसत आहे. मात्र, महागाई काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधलाय.

मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटलेले आहे, ते गोंधळलेले आहेत. भरमसाठ करवाढ करून डिझेल-पेट्रोलच्या किंमती वाढवलेल्या आहेत. जीएसटीमध्ये वाढ करून आणखी करवाढ करून महागाई वाढवलेली आहे. आज अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळं भारत देशात गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आली असल्याचे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

तांबवे (ता. कराड) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस (Congress) पक्षाकडून ऑगस्ट क्रांती दिनी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी आज देशात महागाई, बेरोजगारीसह सरकारच्या चुकीच्या धोरणावर हल्लाबोल केलाय. देश चुकीच्या लोकांच्या हातात असून हुकुमशाही पध्दतीनं कारभार सुरू असल्यानं लोकशाहीला हानीकारक असल्याचं ते म्हणाले. आमदार चव्हाण म्हणाले, जे श्रीलंका, पाकिस्तान, युके आणि बांग्लादेशात झाले. तशी परिस्थिती भारतात येवू नये, यासाठी योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. संसदेत चर्चा होत नाही, त्यामुळं फार चिंतेचं वातावरण आपल्या देशात आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT