Scam in Samruddhi Mahamarg
Scam in Samruddhi Mahamarg Sakal
महाराष्ट्र

Samruddhi Highway News: समृद्धी महामार्गात १,००० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा?; काँग्रेसच्या आरोपाने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

Samruddhi Highway News: मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनामध्ये १००० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. याच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्याची मागणीही केली आहे.

समृद्धी महामार्गाच्या जालना नांदेडमधल्या भागासाठी जमीन संपादनामध्ये १ हजार कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घोटाळ्यामध्ये जालना आणि परभणी जिल्ह्यातल्या काही दलालांचाही सहभाग आहे. तसंच माजी मंत्रीही यामध्ये सामील असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे.

या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठित करावी अशी मागणीही गोरंट्याल यांनी केली आहे.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी ही मागणी केली आहे. या महामार्गासाठी संपादित कऱण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देताना ज्या प्रमाणात खर्च होतोय, त्यापेक्षा कमी खर्च महामार्गाच्या कामासाठी लागणार आहे.

समृद्धी महामार्गाचा प्लॅन तीन वर्षांपूर्वी लीक झाल्याचा आरोपही गोरंट्याल यांनी केला आहे. काही माजी मंत्री आणि दलालांनी महामार्गात जाणाऱ्या जमिनी आधीच कमी किमतीने खरेदी केल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे. या जमिनी फळबागा म्हणून दाखवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT