nana patole nana patole
महाराष्ट्र बातम्या

केंद्रीय मंत्र्यांची हकालपट्टी करावी, नाना पटोलेंची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जातोय. आशिष मिश्राला अटक केली. पण त्यांना न्यायालयीन कोठडीत टाकून वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. ३०२ कलमाअंतर्गत कारवाई व्हावी आणि केंद्रीय मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (maharashtra congress president nana patole) म्हणाले.

लखीमपूर येथील दुर्दैवी घटनेच्या विरोधात महाराष्ट्र बंद आहे. व्यापारीसुद्धा यामध्ये सहभागी झाले आहेत. मोदींचे सरकार केंद्रात आल्यानंतर जीएसटीच्या माध्यमातून लहान व्यापाऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. या बंदमध्ये सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांचे धन्यवाद. राज्यात महाविकास आघाडीच्यावतीने बंद होत असून केंद्रातील अत्याचारी भाजपला हा धडा आहे, असेही पटोले म्हणाले.

१५ हजार कोटी रुपये आम्ही नुकसानीसाठी केंद्राला मागितले होते. तो आमचा अधिकार आहे. त्याऐवजी त्यांनी फक्त दीड हजार कोटी देण्याची घोषणा केली आहे. पण, अजून मिळाले नाही. काही भागात पाऊस नाही. त्यामुळे शेतीच्या पंपाला विद्युत राहिली नाही. कोळशाअभावी अनेक विद्युत पुरवठा केंद्र बंद झाले आहेत. महाराष्ट्र अंधारात जाण्यासाठी केंद्र पुरेपुर प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्येच अशी परिस्थिती निर्माण झाली. हे दोन्ही भाजपविरोधी राज्य आहे, त्यामुळेच अशा घटना घडतात. दबावतंत्र आम्ही मान्य करणार नाही, असं केंद्र सरकार म्हणतंय. महाविकास आघाडी सरकारला संवेदना आहेत. त्यामुळेच सरकार शेतकऱ्यांना मदत करत असल्याचेही पटोले म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT