सॅनिटायझर ESAKAL
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील कोरोना नियंत्रणात। २७ जिल्ह्यांतून हद्दपार होतोय कोरोना

१ ते २४ एप्रिल या काळात राज्यातील तब्बल २७ जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रत्नागिरी, सांगली, नंदुरबार, लातूर, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर १४ जिल्ह्यांमध्ये मागील २४ दिवसांत नवीन रुग्ण वाढलेले नाहीत.

तात्या लांडगे

सोलापूर : देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त होत असतानाच १ ते २४ एप्रिल या काळात राज्यातील तब्बल २७ जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रत्नागिरी, सांगली, नंदुरबार, लातूर, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर १४ जिल्ह्यांमध्ये मागील २४ दिवसांत नवीन रुग्ण वाढलेले नाहीत.

राज्यात मार्च २०२० च्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि आतापर्यंत तीन लाटा येऊन गेल्या आहेत. आतापर्यंत राज्यातील ७८ लाख ७६ हजार ८४१ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील एक लाख ४७ हजार ८३४ जणांचा कोरोनाने जीव घेतला. पण, कोविशिल्ड, कोवॅक्सिन, कोर्बोवॅक्स या प्रतिबंधित लसीमुळे कोरोनाची धार बोथट झाली आणि मृत्यूवर नियंत्रण आले. दुसरीकडे शासनाच्या निर्बंधांमुळेही कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मोठी मदत झाली. मागील २४ दिवसांत राज्यात अडीच हजार रुग्ण वाढले, पण दिलासादायक बाब म्हणजे १ ते २४ एप्रिल या काळात २० सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. १ एप्रिलला राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९३७ होती तर २४ एप्रिलला हीच सक्रिय रुग्णसंख्या ९१६ पर्यंत खाली आली आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता कमीच आहे, पण निष्काळजीपणा नको, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, उद्या (सोमवारी) यासंदर्भात टास्क फोर्सची बैठक होणार आहे.

प्रतिबंधित लसीमुळे नऊ कोटी लोक सुरक्षित
राज्यातील १२ वर्षांवरील सर्वांनाच कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचली जात आहे. १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोर्बोवॅक्स तर १५ ते १७ वयोगटातील मुलांना कोवॅक्सिन लस टोचली जात आहे. १८ वर्षांवरील सर्वांनाच कोविशिल्ड लस टोचली जात आहे. दोन डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तींना संरक्षित डोस दिला जात आहे. राज्यातील १२ वर्षांवरील ११ कोटी व्यक्तींपैकी नऊ कोटी व्यक्त प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेऊन सुरक्षित झाले आहेत.

कोरोनाचा धोका टळलेले जिल्हे
एप्रिल महिन्यात मुंबई, रायगड व धुळे या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची थोडीशी वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ११ जिल्हे कोरोनमाक्त झाले आहेत. दुसरीकडे सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, नागपूर, गोंदिया व गडचिरोली या १६ जिल्ह्यांमधील कोरोनाचा संसर्ग एप्रिलमध्ये वाढलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुरात वाहून गेला हत्ती! नागालँडमधून १०० किमी दूर पोहोचला आसामला, वनविभागाच्या प्रयत्नामुळे वाचला जीव

Jantar Mantar: देशातल्या 'या' शहरांमध्ये आहे दिल्लीसारखं जंतर-मंतर! वाचा वेधशाळांचा रंजक इतिहास!

Latest Marathi News Update : मुंबई लोकलमध्ये थरार, विलेपार्ले स्थानकात ५ स्फोटांचा आवाज

Koyna Dam: कोयना धरणात २४ तासांत ३ टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा ७५ टीएमसीवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पेपर लीक आंदोलनानंतर दिल्लीत E20 इंधन धोरणाविरोधात टॅक्सी संघटनांचा एल्गार; 4 ऑगस्टला संसद मार्चची घोषणा!

SCROLL FOR NEXT