Sanjay Raut And Keshav Upadhye  esakal
महाराष्ट्र बातम्या

'राऊत साहेब ! राज्य सरकारच्या नाकर्त्यापणामुळे देशात सर्वाधिक कोरोना बळी'

देशातील एकमेव राज्य आहे ज्या राज्याने कोरोना काळात जनतेला कोणतेही पॅकेज दिले नाही.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्राचा अपमानाचा मुद्दा संजय राऊतसारखा बोलत आहेत. पण राऊत साहेब महाराष्ट्राची मान तेव्हाच खाली गेली जेव्हा राज्य सरकारच्या नाकर्त्यापणामुळे देशात सर्वाधिक कोरोना बळी गेले. महाराष्ट्राचा अपमान तेव्हाच झाला जेव्हा राज्याच्या गृहमंत्र्यांवर १०० कोटी खंडणीचे आरोप आयुक्तांनी केले. राज्याचा अपमान तेव्हा होतो जेव्हा राज्यात गेल्या दोन वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांचा आत्महत्या झाल्या, असा हल्लाबोल भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhey) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) केला आहे. संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरल्याची टीका केली होती. त्यावर सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. (Corona Death Hikes In Country Due To State Government, Said Keshav Upadhye)

आज केलेल्या आपल्या ट्विटमध्ये उपाध्ये म्हणतात, की राज्य सरकारच्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांच भवितव्य अंधारात जात तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत असतो. राज्य सरकार राज्यातील जनतेचा अपमान सातत्याने केला. देशातील एकमेव राज्य आहे ज्या राज्याने कोरोना काळात जनतेला कोणतेही पॅकेज दिले नाही. याबद्दल कधी बोलणार, असा सवाल त्यांनी राऊतांना केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT