पुणे - राज्यातील जवळपास दीड कोटी सातबारा उताऱ्यांत बदल करण्यात आले आहेत. त्यावर आता सरकारचा व ई-महाभूमीचा लोगो असलेला वॉटरमार्क तसेच गावाच्या नावाचा कोड असणार आहे. त्यामुळे बनावट सात-बारा तयार करून फसवणूक करणाऱ्यांना चाप बसला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्याच्या अनेक भागात अद्यापही जमिनींच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून सातबारा उतारा वापरला जातो. बनावट सातबारा उतारा दाखवून जमीन लाटणे, त्यांची खरेदी-विक्री करणे आदी प्रकार यापूर्वी घडले आहे. सरकारी भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो समजत नाही. त्यामुळे संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्याचा निर्णयास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. राज्यात सुमारे २ कोटी ५३ लाख सातबारा उतारे आहेत. त्यापैकी जवळपास दीड कोटी सातबारा उताऱ्यात बदल करण्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच या बदललेल्या स्वरूपातील सातबारा उतारा नागरिकांना आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे राज्याचे ई-फेरफार प्रकल्प समन्वयक रामदास जगताप यांनी सांगितले.
असा असेल बदल
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.