Farmer 
महाराष्ट्र बातम्या

कर्जमाफीच्या सवलतीचा अध्यादेश काही निघेना; घोषणा झाली अंमलबजावणी केव्हा?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याबाबतचा अध्यादेश अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे याबाबत केवळ घोषणाच झाली आहे. प्रत्यक्षात याची अंमलबजावणी केव्हा होणार आणि त्यासाठीचा लाभ नेमका कोणाला मिळणार, याबाबत बँका आणि शेतकरी संभ्रमात पडले आहेत.        

या निर्णयाच्या अंमलबजावणी बाबत सहकार खात्याकडेही मार्गदर्शक तत्वे किंवा नियमावलीही आलेली नाही. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचे प्रत्येकी दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सरकारने विधिमंडळ अधिवेशनात केली आहे. 

यानुसार येत्या एप्रिल आणि मे महिन्यात हे पैसे संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येतील, असेही सरकारने जाहीर केले होते. दरम्यानच्या  काळात राज्यात कोरोना विषाणू संसर्ग सुरू झाला. त्यामुळे सरकारने आपले पुर्ण लक्ष या विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठीच्या मोहिमेवर केंद्रित केले. तसेच पीककर्ज परतफेडीसाठीची अंतिम मुदतही तीन महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आता येत्या ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. प्रचलित पद्धतीनुसार दरवर्षी ३१ मार्च ही अंतिम मुदत मुदत असते.       

या निर्णयाचा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार ४८० शेतकऱ्यांनी या दोन्ही हंगामात मिळून सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे पिककर्ज घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना समन्स बजावले, हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Shirpur Election : काँग्रेसचा बालेकिल्ला आता भाजपमय! अमरीशभाई पटेलांच्या नेतृत्वाखालील भाजप स्वबळावर ठाम

Latest Marathi News Live Update : वंदे मातरम हे भारताचे एक पवित्र गीत आहे - हर्षवर्धन सपकाळ

Ranji Trophy 4th Round: मुंबईची दणक्यात सुरुवात, मुशीर खान, सिद्धेश लाडची शतकं; महाराष्ट्राविरुद्ध कर्नाटकच्या अडीचशे धावा पार

Thane News: तातडीने उपाययोजना न झाल्यास भटके कुत्रे महापालिकेत सोडू, ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा; प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT