Farmer 
महाराष्ट्र बातम्या

कर्जमाफीच्या सवलतीचा अध्यादेश काही निघेना; घोषणा झाली अंमलबजावणी केव्हा?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याबाबतचा अध्यादेश अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे याबाबत केवळ घोषणाच झाली आहे. प्रत्यक्षात याची अंमलबजावणी केव्हा होणार आणि त्यासाठीचा लाभ नेमका कोणाला मिळणार, याबाबत बँका आणि शेतकरी संभ्रमात पडले आहेत.        

या निर्णयाच्या अंमलबजावणी बाबत सहकार खात्याकडेही मार्गदर्शक तत्वे किंवा नियमावलीही आलेली नाही. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचे प्रत्येकी दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सरकारने विधिमंडळ अधिवेशनात केली आहे. 

यानुसार येत्या एप्रिल आणि मे महिन्यात हे पैसे संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येतील, असेही सरकारने जाहीर केले होते. दरम्यानच्या  काळात राज्यात कोरोना विषाणू संसर्ग सुरू झाला. त्यामुळे सरकारने आपले पुर्ण लक्ष या विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठीच्या मोहिमेवर केंद्रित केले. तसेच पीककर्ज परतफेडीसाठीची अंतिम मुदतही तीन महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आता येत्या ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. प्रचलित पद्धतीनुसार दरवर्षी ३१ मार्च ही अंतिम मुदत मुदत असते.       

या निर्णयाचा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार ४८० शेतकऱ्यांनी या दोन्ही हंगामात मिळून सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे पिककर्ज घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जसप्रीत बुमराहला IND vs PAK सामन्यात खेळवलं नाही तरी चालेल! सुनील गावस्कर यांना नेमकं म्हणायचंय तरी काय?

Royal Enfield Hunter 350: जीएसटी घटल्यानंतर बुलेटची किंमत किती? सगळ्या मॉडेल्सच्या प्राईज जाणून घ्या

Bin Lagnachi Goshta : बॉलिवूडकरांनी केलं 'बिन लग्नाची गोष्ट’चे कौतुक; सिनेमाची होतेय चर्चा

Latest Marathi News Updates : वसईच्या गिरीराज कॉम्प्लेक्समधील कंपनीला भीषण आग

Shirurkasar Flood: महापुरानंतर बेपत्ता; शिरूरकासार तालुक्यातील ६९ वर्षीय नागरिकाचा चौथ्या दिवशीही काहीसा ठावठिकाणा नाही

SCROLL FOR NEXT