decision of 5 days week taking in cabinate meeting  
महाराष्ट्र बातम्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था

मुंबई : ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज (ता. १२) पार पडली. या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता ५ दिवसांचा आठवडा असेल. अनेक दिवस प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला आज अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाली. २९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमवबजावणी करण्यात येईल.

मागील अनेक वर्ष राज्य सरकारचे कर्मचारी प्रतिनीधी पाच दिवसांचा आठवडा व्हावा यासाठी पाठपुरावा करत होती. मात्र, काही ना काही अडचणींमुळे हा निर्णय होऊ शकला नव्हता. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.  

नुकत्याच सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी चर्चा करण्यात आली होती. अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे, डॉ. सोनाली कदम, तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव नितिन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे व इतर काही अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. याच बैठकीत हा निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2026 री-एग्झामचा सुद्धा पेपर झाला लीक? टेलिग्रामवरील दाव्यांची NTA कडून सायबर क्राइमकडे चौकशी

Nagpur News : पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिम्मत नाही; विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, सुसाइड नोटमुळे खळबळ

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT