महाराष्ट्र

CM Eknath Shinde : सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

संतोष कानडे

मुंबईः आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे अवकाळी पावसाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत ट्विटदेखील केलं आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये करण्यात आलेले असून पूर्वीच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आलीय. कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागासाठी हा निर्णय घेण्यात आला. तसेच अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आलेले आहे.

यासह उद्योग विभागांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाला असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT