Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis 
महाराष्ट्र

फडणवीसांची डोकेदुखी वाढली

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - भाजपमध्ये आलेल्या आयारामांनी स्वगृही परतण्याच्या सुरू केलेल्या हालचाली आणि पक्षातीलच ओबीसी नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उचल खाल्ल्याने भविष्यात १०५ आमदारांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या फडणवीस यांचे प्रयत्न अयशस्वी ठरणार असल्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे १०५ जागा जिंकलेल्या भाजपला राज्यात सत्ता काबीज करता आलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा केलेले सत्तास्थापनेचे प्रयत्न दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने हाणून पाडले असले, तरी काही महिन्यांतच पुन्हा सत्तेत येणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दिले होते. मात्र भविष्यात फडणवीस यांच्यासमोरील अडचणी वाढणार असल्याचे वातावरण भाजपमध्येच तयार होत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सत्तेसाठी भाजपमध्ये गेलेले आयाराम गयाराम बेचैन झाले आहेत. अनेक नेत्यांनी आमदारकीचा राजीनामा देत स्वगृही परतण्याचा मनोदय व्यक्‍त केल्याचे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, अडचणीच्या काळात साथ दिलेल्या आमदारांना विचारूनच निर्णय घेण्यात येईल, असे सांगून त्यांनी ‘या’ नेत्यांना काँग्रेसची दारे खुली असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. 

भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत घेण्याचा अजून निर्णय झालेला नाही; परंतु पक्षवाढीसाठी किंवा पक्षाच्या हितासाठी त्यांचा काही उपयोग होत असेल तर भविष्यात त्यांना पक्षात पुन्हा घेण्याबाबत निर्णय होऊ शकतो.
- नवाब मलिक, प्रवक्‍ते, राष्ट्रवादी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT