महाराष्ट्र बातम्या

'फडणवीस-अजित पवारांचे सरकार बेकायदा'

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार बेकायदा असून, विधानसभेत विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी या दोघांकडे बहुमत नाही हे सिद्ध करून दाखवू, असा दावा कॉंग्रेसने केला आहे. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या संयुक्त याचिकेवर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सर्व संबंधित दस्तावेज उद्या (ता. 25) सकाळी साडेदहा वाजता सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना विधानसभेच्या पटलावर भाजपचा पराभव होईल, असा दावा केला. भाजप आणि अजित पवार यांनी आमदार सोबत नसताना आणि बहुमत नसताना घटनात्मक सर्व संकेतांना हरताळ फासला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस सरकार पूर्णपणे बेकायदा असल्याने त्यांना सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाने घोडेबाजार होऊ न देता त्वरित सभापटलावर बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. आम्ही जे दस्तावेज सादर केले आहेत, त्याआधारे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा विश्‍वासही चव्हाण यांनी बोलून दाखवला.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना अशा एकत्रित संख्याबळाची खात्री नसती, तर सभापटलावर बहुमताच्या चाचणीची आम्ही मागणी केलीच नसती. ज्यांना याची भीती आहे ते तांत्रिक मुद्दे काढून वाढीव मुदत मागत आहेत, असा टोलाही चव्हाण यांनी या वेळी लगावला. 

'राज्यपालांकडून अधिकृत वक्तव्य नाही' 

दरम्यान, राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस - अजित पवार यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेल्या 30 नोव्हेंबरपर्यंतच्या कथित मुदतीवर सुरजेवाला यांनी प्रश्‍न उपस्थित केला. राज्यपालांकडून 30 नोव्हेंबरबद्दलचे कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाही. कायदामंत्र्यांनी अनौपचारिकपणे राज्यपालांच्या वतीने सांगितले आहे, त्यामुळे 30 नोव्हेंबर ही तारीख कोठून आली, असा खोचक प्रश्‍न सुरजेवाला यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT