Chandrakant Patil Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

"मूठभर लोकं देशभक्त मुसलमानांना बदनाम करताय"

मालेगावसह राज्यातील काही ठिकाणी आज मुस्लीम समजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

सुधीर काकडे

त्रिपुरामध्ये मुस्लीम समुदायावर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यातील वेगवेळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाला नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि अमरावतीमध्ये गालबोट लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये काही ठिकाणी पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर बोलताना राज्य सरकारला या प्रकरणाची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील याची काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. "त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार चिंताजनक असल्याचे म्हणत, राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!" अवाहन त्यांनी राज्य सरकारला केलं आहे.

विदेशात घडलेल्या एखाद्या घटनेचे भारतात पडसाद उमटावेत, हे न कळणारे समीकरण असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. "काही मूठभर लोकं देशभक्त असणाऱ्या मुसलमानांनाही बदनाम करण्याचे काम करतात, त्यांना भारतीय मुस्लिम समुदायाने धडा शिकवला पाहिजे आणि योग्य तो समज दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवणारं सरकार केवळ नावापुरते म्हणायचं. शिवरायांच्या काळात प्रजा अतिशय सुखी होती, त्यांना रयतेच्या मनातलं कळायचं. राज्य सरकारचा निर्दयीपणा उघड पडला आहे. तुमच्याकडून सुरू असलेला प्रकार अमानवीय आहे. यापूर्वी असे कधीही राज्यात घडले नव्हते." असं म्हणत त्यांनी सरकारवर देखील टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT