Devendra Fadnavis
Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र

आमच्या नेत्यांच्या घरात माणसं घुसवून मापं घेतली, पण... फडणवीसांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा काहींचा प्रयत्न असतो मात्र,.. फडणवीसांचा रोख कुणावर?

महाराष्ट्रातील सत्ताधारी लोकांचं लक्ष्य वेधून करण्याकरता या सर्व गोष्टी करत आहेत. आमच्या नेत्यांच्या घरात माणसं घुसवून मापं घेतली आहेत. मात्र आता पुराव्याच्या आधारे गोष्टी मिळाल्या आहेत. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करून त्याला लुटण्याचं काम सुरु असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा काहींचा प्रयत्न असतो. मात्र आता जनतेला कळलं आहे, असा हल्लोबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजपचा 42 व्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत जनतेशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलं.

यावेळी महाराष्ट्र सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले, आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही मात्र येत्या काळात भ्रष्टाचार आणि राजकारण करून जनतेची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात लढा असणार आहे. सत्ताधाऱ्यांनी वर्षानुवर्ष या भ्रष्टाचाराच्या विळख्यातून स्वतःच्या प्रॉपर्टी तयार केल्या आहेत. भ्रष्टाचार करत महाराष्ट्राची संस्कृती पायदळी तुडवण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे. महाराष्ट्राची प्रतिमा संपूर्ण देशामध्ये मलीन करण्याच काम सुरु आहे. त्यामुळे राज्याला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी एक मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचेही ते म्हणाले आहे.

पुढे ते म्हणाले, मुंबईच्या महानगरपालिकेने केलेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली आहेत. गरिब, सामान्य माणसाच्या कामी येणारे हजारो कोटी रुपयांवर राज्यातील सत्ताधाऱ्यांनी डल्ला मारला आहे. यासंदर्भातली इत्यंभूत माहिती भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पुराव्यासहित मांडली आहे. कोरोना काळात मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणेही सत्ताधाऱ्यांनी सोडलेलं नाही. त्यामुळे याविरोधात संघर्ष करुन मुंबईला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

ते म्हणाले, पत्रावाला चाळ मराठी माणसाचा प्रश्न आहे. सध्या या सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश होत आहे. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं आणि मराठी माणसाला लुटाण्याचं कारसस्थान स्पष्ट झालं आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पद देऊन राज्याचं मोठं नुकसान केलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीवर आघात सुरु आहे. मात्र भाजपा पक्षाचा मालक कोणी नाही. या पक्षाचा मालक जनता असून कार्यकर्त्यासह गरीबातील गरीब माणूसही देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. सामान्य माणूनही कोणत्याही पदावर जाऊ शकतो ही खरी लोकशाही आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT