Fadnvis corona.jpg 
महाराष्ट्र बातम्या

पूरग्रस्तांसाठी दिलेलं ११,५०० कोटींचं पॅकेज फसवं - फडणवीस

शेतकऱ्यांना कुठलीही मदत दिलेली नाही

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील नुकत्याच येऊन गेलेल्या पूरबाधितांना (flood affected) ठाकरे सरकारनं (Thackeray Govt) तातडीची ११,५०० कोटींची मदत जाहीर केली. पण या मदतीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी टीका केली आहे. प्रत्यक्षात ही मदत खूपच तोकडी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी या मदतीचं विश्लेषणही केलं आहे.

फडणवीस म्हणाले, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने ११,५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. याचे विश्लेषण पाहता केवळ १,५०० कोटी रुपयांचीच तातडीची मदत केलेली दिसून येते. कारण पूनर्बांधणीचे ३,००० कोटी आणि दिलासा उपाययोजनांचे ७,००० कोटी असे १० हजार कोटी रुपये हे दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात. त्यामुळे प्रत्यक्ष मदत ही १५०० कोटी रुपयांचीच दिसून येते.

राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाचे अवलोकन केले असता शेतीपिकांचे नुकसान, अन्नधान्य पुरवठा, स्वच्छता अनुदान, घरांसाठी वाळू-मुरूमची उपलब्धता अशा सन २०१९ मध्ये देण्यात आलेल्या अनेक मदतींचा त्यात उल्लेख दिसून येत नाही, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या मदतीबाबतचा विस्तृत शासन आदेश जारी झाल्यानंतरच याबाबत आणखी स्पष्टता येईल. त्यानंतरच या मदतीवर सविस्तर प्रतिक्रिया देता येईल. प्रथमदर्शनी तरी शेतकर्‍यांसारख्या महत्त्वाच्या घटकाला कुठलीही मदत केलेली दिसून येत नाही, अशी टिपण्णीही देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांच्या पॅकेजवर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT