Political
Political esakal
महाराष्ट्र

ठाकरे सरकारनं सुरज जाधवला आत्महत्येस भाग पाडलं; फडणवीसांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यासंदर्भात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांना हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. दरम्यान, सरकरानेच सुरजवर आत्महत्या करण्याची वेळ आणली असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. याविषवरून आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धारेवर धरलं आहे.

ते म्हणाले, मविआ सरकारच्या काळात शेतकऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. विजतोडणीमुळे अनेक अडचणी उभ्या राहत आहेत. याच अडचणीमुळे तरुण शेतकरी सुरज जाधव याने फेसबूक लाईव्ह करत आत्महत्या केली. मात्र या सरकराने सुरजवर आत्महत्या करण्याची वेळ आणली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. २३ वर्षीय सुरज जाधवने वीज कनेक्शन तोडल्याने पिकाचे नुकसान होणार या काळजीने आत्महत्या केलेल्या व्हिडिओत सरकारला कारणीभूत ठरवलं आहे. मात्र आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही टोकाचे पाऊल उचलु नका, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

पुढे ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वीज तोडणी करु नये असे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना थोडे पैसे भरून मे महिन्यापर्यंतची त्यांनी सवलत दिली आहे. तरीही त्याची अमंलबजावणी सरकारकडून झालेली नाही. ठाकरे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT