dhanajay munde
dhanajay munde esakal
महाराष्ट्र

विरोधकांच्या राजकारणामुळे ED ला, 'बिडी'ची किंमत राहिली नाही

सकाळ डिजिटल टीम

'राज्यातील शांतता व सलोखा बिघडवण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करताहेत'

सध्या राज्याचे सामाजिक सौख्य बिघडले आहे. राज्यात अशांतता (Law & Order) निर्माण करण्याचा अनेकांचा प्रयत्न सुरू आहे. 'ईडीनंतर आता (ED) यांना भोंग्याचा मुद्दा (Loudspeaker) आठवला आहे. विरोधकांच्या या राजकारणामुळे याच ‘ईडी’ला आता साध्या 'बिडी'चीही किंमत उरलेली नाही, असे वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी केले.

यावेळी मंत्री मुंडे यांनी केंद्र सरकार व वाढत्या महागाईचा चौफेर समाचार घेतला. ते म्हणाले, राज्यातील शांतता व सलोखा बिघडवण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करत आहेत. जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवण्यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा एकजूटीन काम करायला हवं. तुमची कामे करण्यासाठी आम्ही मुंबईला बसलो आहोत. आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून केवळ अमळनेर मतदारसंघातच नाही तर जळगाव जिल्ह्यात विकासाच्या विविध योजना आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे राजकीय ओबीसी आरक्षणापासून वंचित राहावं लागत असल्याचा हल्लाबोल खडसे यांनी केला. ओबीसी समाज एकत्र आला नाही तर यापुढे शैक्षणिक आरक्षणालाही मुकावे लागेल की काय अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले, पारोळा तालुक्यात मात्र अमळनेर मतदारसंघात येणाऱ्या ४२ गावांचा माझ्या आमदारकीच्या विजयात सिंहाचा वाटा आहे. या गावांमध्ये विकासकामांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बियाणाच्या प्रश्नाला त्यांनी हात घातला. बियाणे विक्री लवकरात लवकर करावी, जेणेकरून बियाणांचा काळा बाजार होणार नाही व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील, याची काळजी सरकारने घ्यावी असे आवाहन आमदार पाटील यांनी केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT