महाराष्ट्र

'मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणे पांढऱ्या पायाचे'

सकाळ वृत्तसेवा

नैसर्गिक आपत्तीतही केंद्रीय मंत्री नारायण राणे राजकारण करत आहेत. नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्यानेच कोकणवर ही आपत्ती ओढावली. ते पांढऱ्या पायचे आहेत, अशा घणाघात शिवसेना उपनेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. जळगाव येथे पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी गुलाबरावर पाटील यांनी राणेंच्या वक्तव्यावर निशाणा साधला.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील सोमवारी जळगावात आले होते. यावेळी त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आपल्या खास स्टाईलमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, 'मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांवर संकट ओढावलं आहे. या आपत्तीमधून सावरण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे. या परिस्थितीचा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन काम करत आहेत. पण या नैसर्गिक आपत्तीचे केंद्रीय मंत्री नारायण राणे राजकारण करत आहेत. नारायण राणे पांढऱ्या पायाचे असल्यामुळेच मंत्री झाल्यामुळे कोखणवर ही आपत्ती ओढावली आहे.'

एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी राजकीय आखाडा हा रिकामाच असतो. पण अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये पीडितांना सहकार्य करणे हेच लोकप्रतिनिधींचे पहिलं कर्तव्य असते. हे कर्तव्य राज्यकर्ते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतर नेते देखील पार पाडत आहेत. तेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अशा आपत्तीत राजकारण न करता काम करण्याची गरज असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT