home
home 
महाराष्ट्र

सरकारी अधिकाऱ्यांना दुसऱ्या घराचे वाटप का? 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - सरकारी अधिकाऱ्यांना सरकारी योजनेतून घर मिळालेले असताना त्यांना दुसरे घर का देता, अशी विचारणा करत याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने आज दिले. मुंबईत स्वत:चे घर असलेल्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना ठाणे किंवा नवी मुंबईत पुन्हा घर देण्याची गरजच काय, असा प्रश्‍नही न्यायालयाने उपस्थित केला. 

राज्याबाहेरून आलेल्या मुख्य न्यायाधीशांना मुंबईत सरकारी योजनेतून घर देण्यात येत आहे. सत्र न्यायालयातील न्यायाधीशांना डावलून केवळ मुख्य न्यायाधीशांना घरांसाठी भूखंड देण्याच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. आमदार, खासदार, आयएएस, आयपीएस अधिकारी आणि विद्यमान न्यायाधीशांची मुंबईत स्वत:ची घरे असताना त्यापैकी अनेकांकडून सरकारी योजनेअंतर्गत मुंबईलगतच्या ठाण्यात किंवा नवी मुंबईतील पाम बीच रोड आदी मोक्‍याच्या ठिकाणी नव्या घराची मागणी केली जाते. या प्रवृत्तीला न्यायालयाने पायबंद घालावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT