Jilha Madhyawarti bank 
महाराष्ट्र बातम्या

जिल्हा बॅंकांची वाढली 23 हजार कोटींची थकबाकी; 23 बॅंकांची वसुली 40 टक्‍क्‍यांपेक्षाही कमीच 

तात्या लांडगे

सोलापूर : जगाचा पोशिंदा असलेल्या बळिराजाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी फडणवीस सरकारने दीड लाखाची तर ठाकरे सरकारने दोन लाखांची कर्जमाफी दिली. तरीही सद्य:स्थितीत राज्यातील 39 लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे 23 हजार 102 कोटींची नवी थकबाकी वाढली आहे. त्यामध्ये कर्जमाफीपूर्वी नियमित असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. 

राज्यातील 30 जिल्हा बॅंकांनी मागच्या वर्षी 31 हजार 527 कोटी 43 लाखांचे शेती व बिगरशेतीसाठी कर्जवाटप केले. मात्र, अतिवृष्टी, पूर, अवकाळीमुळे अडचणीत सापडलेल्या बळिराजाला बॅंकांच्या कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे एकूण कर्जवाटपातील आठ हजार 425 कोटी 40 लाखांचीच कर्ज वसुली झाली आहे. दरम्यान, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, नाशिक, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बीड, बुलडाणा व नागपूर या जिल्हा बॅंकांनी मागील वर्षात शेती व बिगरशेतीसाठी 14 हजार 76 कोटींचे कर्जवाटप केले. मात्र, त्यातून फक्‍त 781 कोटी 78 लाखांचीच वसुली झाली आहे. तर दुसरीकडे लातूर, भंडारा, सातारा, चंद्रपूर, ठाणे, गडचिरोली आणि जळगाव या जिल्हा बॅंकांची वसुली 41 टक्‍क्‍यांहून अधिक झाल्याचे राज्य बॅंकेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

कर्जवाटपासाठी बॅंकांकडून स्वतंत्र अधिकारी नियुक्‍त 
कर्जमाफीनंतरही शेती व बिगरशेती कर्जाची थकबाकी तथा येणेबाकी वाढू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर बहुतांश बॅंकांनी आता नियमांवर तंतोतंत बोट ठेवत शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. कर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्षात जाऊन पिकांची पाहणी करणे, कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे, अशी कामे त्यांच्यावर सोपविण्यात आली आहेत. 

जिल्हा बॅंकांचा पसारा 

  • एकूण जिल्हा बॅंका : 30 
  • मागील वर्षी कर्जवाटप : 31,527.43 कोटी 
  • कर्जाची वसुली : 8,425.40 कोटी 
  • सर्व प्रकारच्या कर्जांची थकबाकी : 23,102.03 कोटी 

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे म्हणाले, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शेती कर्जाची थकबाकी 627 कोटी आहे. कर्जमाफीनंतर बहुतांश शेतकरी नियमित कर्जदार झाले, परंतु कर्जमाफीपूर्वी नियमित कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांकडेच आता थकबाकी वाढली आहे. कोरोनामुळे रिझर्व्ह बॅंकेने ऑगस्टपर्यंत कर्ज वसुलीस मुदतवाढ दिल्याने आता ऑगस्टनंतर वसुली अपेक्षित आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT