dust storm Sakal
महाराष्ट्र बातम्या

धुलीकणांचे वादळ नव्हे; धुळ,धुक्याचा परिणाम - हवामान तज्ज्ञ जोहरे

यामुळे थंडी वाढणार असून नागरिकांनी घाबरुन न जाता आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उत्तरे कडून येणारे पश्चिमी विक्षोभ किंवा वेस्टर्न डिस्टर्बन्स वारे राजस्थान मधील वाळवंटातील धुळ व धुलीकण महाराष्ट्रात वाहून आणत असल्याने धुळ आणि धुके यांच्या मिश्रणातून संपुर्ण महाराष्ट्र व राजस्थानच्या खालच्या बाजू कडील राज्यातील आसमंतात धुरके पसरत दृश्यमानता म्हणजे विझीबिलीटी कमी झाली आहे. अशी वैज्ञानिक माहिती भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली. यामुळे थंडी वाढणार असून नागरिकांनी घाबरुन न जाता आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

धुलीकणांमुळे तयार झालेल्या धुरक्याच्या प्रदूषणाचा परीणाम म्हणून धुलीकणांची वातावरणातील टक्केवारी वरून काढला जाणारा पीएम 2.5 व पी एम 10 पोल्यूशन इंडेक्स हा 150 ते 250 पर्यंत वाढला असून स्थानिक पातळीवर असलेले खोदकाम व बांधकाम यामुळे यात अधिक भर पडत आहे.

राज्यभरातील तापमानात यामुळे घट होणार असल्याने 'कोल्ड शाॅक'चा म्हणजे अचानक कमी वेळात दहा किंवा जास्त अंश सेल्सिअस तापमान कमी होत शरीराला झटका बसण्याचा धोका देखील असल्याने माणसांबरोबर आपल्या पशुपक्षी व पिकांची देखील काळजी घेणे गरजेचे आहे असे ही जोहरे म्हणाले. अशा परिस्थितीत गरोदर स्त्रीया, वृद्ध, लहान मुले दमा-अस्थमा, ब्लड प्रेशर, डायबिटिस आदींचे रुग्ण यांनी जास्त जागृत राहणे गरजेचे आहे असे ही ते म्हणाले.

पश्चिमी विक्षोभ म्हणजे काय?

पश्चिमी विक्षोभ किंवा वेस्टर्न डिस्टर्बन्स याचा अर्थ हिमालयाला वळसा घालून अफगाणिस्तान, पाकिस्तान, जम्मू-काश्मीर, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा मार्गाने वारे महाराष्ट्रात शिरकाव करतात. अरबी समुद्रातून उंच उंच सह्याद्री पर्वत पार करीत पश्चिमी विक्षोभ उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात प्रवेश करीत नाही हे महत्वाचे आहे. पश्चिमी विक्षोभ हे थंडी, पाऊस, गारपीट आदी प्रदान करणारे वारे होय. हिवाळ्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील भागात येते, जी भूमध्य समुद्र, अटलांटिक महासागर आणि काही प्रमाणात कॅस्पियन समुद्रातून वातावरणाच्या वरच्या थरांमध्ये ओलावा आणते, ज्यामुळे अचानक पाऊस पडतो. आणि हा पाऊस. बर्फाच्या रूपात, तो उत्तर भारत, पाकिस्तान आणि नेपाळवर पडतो. उत्तर भारतातील रब्बी पिकांसाठी, विशेषत: गव्हासाठी, ही थंड वादळे अत्यंत आवश्यक आहेत.

पीएम 2.5 व पीएम 10 म्हणजे काय?

पीएम म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर अर्थात सूक्षम धुलीकण होय. जे डोळ्यांना दिसत नाहीत, तसेच उपग्रहाने देखील त्याचे छायाचित्र घेणे शक्य नसते. त्याच्या आकारावरून ते पीएम 2.5 व पीएम 10 असे ओळखले जातात. आपल्या मानवी केसांची जाडी साधारणत: 50 ते 70 मायक्रॉन असते. पीएम 2.5 या वातावरणातील धुलीकणांचा आकार 2.5 मायक्रॉन असतो. पण, मानवी केसांच्या जाडीपेक्षा 20 ते 28 पटीने कमी असलेल्या धुलीकणांना पीएम 2.5 म्हंटले जाते. पीएम 10 हे मुख्यतः धुरके बनण्याची प्रक्रिया वेगाने वाढवतात. त्यामुळे पीएम 2.5 पेक्षा चारपटीने मोठे असलेले पीएम 10 हे देखील वातावरणात वाढल्यास हवा प्रदूषित होते व मानवी आरोग्यास हानिकारक ठरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT