Maharashtra-Karnataka border issue Double pension to heirs of martyrs Chief Minister eknath Shinde mumbai esakal
महाराष्ट्र बातम्या

Ekanth Shinde: जो निर्णय कधीही घेतला नाही, तो आमच्या सरकारने घेतला; शिंदेंचा दावा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगली जिल्ह्यातील (Sangli District) जत तालुक्यावर (Jat Taluka) दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत, असं म्हटलं आहे. यावरून वाद पेटला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath SHhinde) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde news in Marathi)

शिंदे म्हणाले की, गावांचा समावेश कऱण्याची मागणी २०१२ ची आहे. त्या भागात पाणीटंचाई होती. आता बऱ्याच योजना केला आहे. अनेक योजना मार्गी लागत आहे. पाण्यावाचून कोणतेही गाव इकडे-तिकडे जाणार नाही आणि एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, याची जबाबदारी आमची आहे.

या संदर्भात आमची बैठक झाली आहे. हा जुना वाद असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सीमावाद सामोपचाराने सोडवला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. शिवाय सीमा भागातील लोकांना मिळणाऱ्या योजनांमध्ये आम्ही वाढ केली. अनेक योजना सुरू केल्या. आरोग्याच्या सुविधा सुरू केल्या. याचा या भागातील लोकांना लाभ होणार असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं.

शेतकरी नुकसानभरापाईबाबत शिंदे म्हणाले की, आतापर्यंत जो निर्णय नुकसान भरपाई देण्याबद्दल कधीही घेतला गेला नव्हता, तो निर्णय आमच्या सरकारने घेतला. सगळे नियम-निकष बदलले. एनडीआरएफचे नियम बाजुला केले. भरापाईसाठी निकष दोन हेक्टरचं तीन हेक्टर केले. गोगलगाईने झालेली नुकसानभरपाई दिली. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अस आश्वासन शिंदे यांनी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात नवं संकट, काळजी घ्या! PM मोदींकडून देशवासियांना महत्त्वाचं आवाहन

farmer Loan Relief: कर्जमाफीच्या निकषांकडे शेतकऱ्यांचे डोळे; ३० जूनपूर्वी जाहीर करण्याचा सरकारचा मानस, काय असतील संभाव्य निकष?

Latest Marathi News Live Update : गोकुळ दूध संघाच्या ‘हलाल सर्टिफिकेट’वरून नवा राजकीय वाद; कोल्हापूरच्या निवडणुकीत मुद्दा तापला

Are you Indian? तुमच्या देशात चालते व्हा...; अमेरिकन नागरिकाकडून भारतीय दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL

Road Accident : हृदयद्रावक घटना! राँग साइडने येणाऱ्या मालवाहू गाडीची दुचाकीला जोरदार धडक; 9 महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT