Kukadi Canal esakal
महाराष्ट्र बातम्या

Kukadi Canal: अखेर नगरकरांना पाणी मिळालं; कुकडी डावा कालव्यातून आवर्तन सुरू

रुपेश नामदास

नारायणगाव : उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी व बिगर सिंचनासाठी कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात पाणी सोडण्यात सुरवात केली आहे. तीस दिवसांच्या आवर्तनात कुकडी डावा कालव्यात कालव्यात ३.६३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. या पाण्याचा लाभ ‘टेल टू हेड’ या पद्धतीने करमाळा, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, जुन्नर या तालुक्यांना होणार आहे.

कुकडी प्रकल्पातील धरणात शुक्रवारअखेर ४.९३४ टीएमसी (१६.६३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गत वर्षी आजअखेर प्रकल्पात २.७८० टीएमसी (९.३७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. या आवर्तनाद्वारे नियोजित सिंचनाच्या पाणी वाटपाचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ९ मे रोजी पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. त्यात जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यासाठी २२ मेपासून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, आमदार अतुल बेनके, भाजप नेत्या आशा बुचके यांच्यासह सर्व पक्षीय नेते व शेतकरी संघटनेने या आवर्तनाला विरोध केला होता. माणिकडोह धरणात पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा शिल्लक ठेवून व पिंपळगाव जोगे धरणातील मृतसाठ्यातील ३ टीएमसीऐवजी दोन टीएमसी व डिंभे धरणातील एक टीएमसी पाण्याचा वापर करून हे आवर्तन पूर्ण करण्याचे फेरनियोजन करून २५ मे रोजी सायंकाळी सात वाजता येडगाव धरणातून डावा कालव्यात ५०० क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरवात केली.

शुक्रवारी सकाळपासून वाढ करून १४०० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. धरणनिहाय शिल्लक उपयुक्त पाणीसाठा टीएमसीत व कंसात टक्केवारी : येडगाव : १.२२८ (६३.१८), माणिकडोह : ०.६५३ (६.४२), वडज : ०.१७९ (१५.३१), डिंभे :२.०३८ (१६.३२), पिंपळगाव जोगे : ०.८३४ (२१.४४).

एक ‘टीएमसी’चा होणार अपव्यय

पाच तालुक्यांना जोडणारा कुकडी डावा कालवा प्रकल्पातील सर्वाधिक २४९ किलोमीटर लांबीचा आहे. करमाळा तालुक्यात पाणी पोचण्यासाठी सात दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर शिल्लक २३ दिवसांपैकी करमाळा तालुक्यासाठी सात दिवस, कर्जत तालुक्यासाठी आठ दिवस, श्रीगोंदा तालुक्यासाठी सहा दिवस, पारनेर व जुन्नर तालुक्यासाठी दोन दिवस आवर्तन नियोजन केले आहे.

कालव्याची झालेली दुरवस्था, बाष्पीभवन, गळती, वहनव्यय यामुळे एक टीएमसी पाण्याचा अपव्यय होणार असून, ३.६३ टीएमसीपैकी २.६३ टीएमसी पाण्याचा वापर प्रत्यक्षात सिंचनासाठी होणार आहे. पाणी सोडण्यासाठी आग्रह धरणारे लोकप्रतिनिधी कालवा दुरुस्तीला निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा का करत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महिन्यात ०.७१० टीएमसी बाष्पीभवन

या वर्षी ४१ अंशांपर्यंत उच्चांकी तापमान असल्याने बाष्पीभवन वेग वाढला आहे. मागील तीस दिवसांत येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे, पिंपळगाव जोगे या धरणातील ०.७१० टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. सर्वाधिक पिंपळगाव जोगे धरणातील ०.२४० टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT