Maharashtra Board Exams  Sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! बोर्डाच्या परीक्षेत भरारी पथके प्रत्येक शाळेला देणार भेट, गैरप्रकार आढळल्यास होणार ‘ही’ कारवाई; आज सोलापुरातील ८०० मुख्याध्यापकांची कार्यशाळा

बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवारपासून (ता. २३) सुरू होत आहे. यंदा प्रथमच प्रात्यक्षिक परीक्षेची पडताळणी भरारी पथकांद्वारे होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक व शहरात दोन भरारी पथके असतील, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली. प्रत्येक पथकाला किमान चार शाळांना भेटी द्याव्याच लागतील, असेही ते म्हणाले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवारपासून (ता. २३) सुरू होत आहे. यंदा प्रथमच प्रात्यक्षिक परीक्षेची पडताळणी भरारी पथकांद्वारे होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक व शहरात दोन भरारी पथके असतील, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली. प्रत्येक पथकाला किमान चार शाळांना भेटी द्याव्याच लागतील, असेही ते म्हणाले.

बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत असणार आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते १८ फेब्रुवारीपर्यंत होईल. त्यानंतर २० फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा पार पडेल. प्रात्यक्षिक परीक्षा देखील शिक्षकांना वाटेल त्या पद्धतीने नव्हे तर बोर्डाने ठरवून दिलेल्या नमुन्यातच घ्यावी लागणार आहे. त्यावर शहर-जिल्ह्यातील ८०० मुख्याध्यापकांना पुणे बोर्डाचे विभागीय अध्यक्ष औदुंबर उकीरडे, सचिव मिनाक्षी राऊत, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप मार्गदर्शन करतील. उद्या (गुरुवारी) रंगभवन येथील सभागृहात सकाळी ११.३० वाजता कार्यक्रमाला सुरवात होणार आहे.

प्रत्येक केंद्रावर राहणार नजर

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा कशा पद्धतीने घ्यावी, यासंदर्भात शहर-जिल्ह्यातील ८०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यंदा प्रथमच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेवेळी शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथके भेटी देतील. लेखी परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत.

- औदुंबर उकीरडे, विभागीय अध्यक्ष, पुणे बोर्ड

...तर परीक्षा केंद्राची मान्यता कायमचीच रद्द

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा पारदर्शक पार पडावी, यासाठी यंदा ठोस उपाययोजना केल्या आहेत. कॉपीमुक्त परीक्षांचे संपूर्ण नियोजन यंदा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. तरीदेखील, ज्या परीक्षा केंद्रावर कॉपीचे गैरप्रकार आढळतील, त्या केंद्राची मान्यता कायमचीच रद्द केली जाणार असल्याचा इशारा बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

दहावी-बारावीची स्थिती

१. (इयत्ता बारावी)

  • एकूण परीक्षार्थी

  • ५४,८७५

  • कनिष्ठ महाविद्यालये

  • ५२३

  • परीक्षा केंद्रे

  • ११९

  • ----------------------

२. (इयत्ता दहावी)

  • एकूण परीक्षार्थी

  • ६४,४५४

  • एकूण शाळा

  • १,०५२

  • परीक्षा केंद्रे

  • १८८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रात शोक; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकातही बदल

Ajit Pawar Death News LIVE Updates : ऐकल्यावर माझा विश्वासच बसला नाही - एकनाथ शिंदे

IND vs NZ, 4th T20I: न्यूझीलंडची दणक्यात सुरुवात, नंतर भारतीय गोलंदाजांनीही दाखवला क्लास; पण तरी विजयासाठी विक्रमी धावांचं लक्ष्य

Ajit Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीला पोहोचल्यावर शरद पवारांनी लोकांना काय विचारलं? वाचून डोळे पाणावतील...

Nagpur News : दादाची आस्थेने विचारणा! गावात सगळ्यांनी जेवण केलं का? ‘चानकी’ गावासाठी ‘दादा’ ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT