sharad-pawar.jpg 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : भाजप आणि शिवसेनेला शेतीची अक्कल नाही : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना शेतकऱ्यांची तळमळ दिसत नाही, त्यांनी शेतीची अक्कल नाही. कांद्याची निर्यात बंद शेतकऱ्यांना मिळणारे दोन पैसे मिळू दिले नाहीत. ही तुमची शेतकऱ्यांची धोरणे आहेत का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून (मंगळवार) सुरवात झाली आहे. पारनेर येथे आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी ईडीच्या कारवाईवरून भाष्य केले. तसेच सरकारलाही लक्ष्य केले.

शरद पवार म्हणाले की, या निवडणुकीला आम्ही खूप महत्त्व दिले आहे. कारण, गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राचा कारभार अशा लोकांच्या हातामध्ये आहे ज्यांनी राज्यातील जनतेसाठी काहीच केले नाही. परिवर्तनासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. पारनेरला दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे येथील नागरिकांना नोकरीसाठी बाहेर जावे लागले. मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीच्या केलेल्या घोषणेचे काय केले. अद्याप 69 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. अशा सत्ताधाऱ्यांनी आपण मत दिले पाहिजे का असा सवाल पवार यांनी केला. यावेळी बाेलताना त्यांनी सरकारच्या शेतीविषय़क धाेरणांना लक्ष्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: काकाच्या हत्येचा बदला? नमाजानंतर चाकूहल्ला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल ठार, जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट!

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

भाविकांसाठी बातमी! विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन तीन दिवस राहणार बंद; मूर्तीवर लवकरच हाेणार रासायनिक प्रक्रिया..

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

Solapur Crime:'अक्कलकोटच्या व्यापाऱ्यास १५ लाख रुपयांना गंडवलं; ब्रोकरमार्फत मुंबईहून मागवलेले खाद्यतेल आलेच नाही!

SCROLL FOR NEXT