sanjay raut sanjay raut
महाराष्ट्र बातम्या

‘आम्हाला सोबत न घेतल्यास काँग्रेसला दहा जागाही मिळणे कठीण होईल’

गोव्यात काँग्रेसचे केवळ तीन आमदार आहेत

सकाळ डिजिटल टीम

गोवा विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) महाराष्ट्रातील युतीचा प्रयोग पुन्हा करण्याच्या काँग्रेसच्या प्रस्तावाला उत्तर न मिळाल्याने शिवसेना नाराज झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay Raut) यांनी गुरुवारी गोव्यातील राजकीय परिस्थिती अशी आहे की काँग्रेसने किनारपट्टीवरील राज्यात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली तर दहा जागाही जिंकता येणार नाहीत, असे म्हटले.

गोव्यात काँग्रेसचे (Congress) केवळ तीन आमदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (National Congress Party) या प्रमुख राजकीय पक्षांनी काँग्रेसला कठीण काळात पाठिंबा दिला होता. परंतु, काँग्रेस काय विचार करीत आहे हे मला माहीत नाही. ती एकटीच लढली तर कदाचित दहाचा आकडाही पार करू शकणार नाही, असेही संजय राऊत (sanjay Raut) म्हणाले.

गोवा (Goa) काँग्रेसचे (Congress) प्रभारी दिनेश गुंडूराव, सीएलपी नेते दिगंबर कामत आणि गोवा काँग्रेसचे प्रमुख गिरीश चोडणकर यांच्याशी आमची चर्चा झाली आहे. काँग्रेसने ४० पैकी ३० विधानसभेच्या जागा लढवाव्यात आणि मित्रपक्षांविरुद्ध लढावे, असा प्रस्ताव आम्ही ठेवला होता, असे राऊत म्हणाले. दहा विधानसभेच्या जागा जिथे काँग्रेसने ५० वर्षांत निवडणूक जिंकलेली नाही त्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला दिल्या जाऊ शकतात, असेही ते म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी युतीच्या बाजूने होते. परंतु, स्थानिक काँग्रेस नेतृत्वाचा दृष्टिकोन वेगळा आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT