महाराष्ट्र बातम्या

मुंबई वगळता गरब्यास सरकारची नियमांसहित परवानगी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई वगळता राज्यभर गरबा खेळण्याची परवानगी सरकारने दिली आहे. मात्र, यासाठी आयोजकांचे आणि गरब्यात सहभागी होणाऱ्यांचे लशीचे दोन डोस पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे. जर गरब्याचे आयोजन बंद हॉलमध्ये करण्यात आलं असेल तर त्या हॉलच्या क्षमतेच्या 50 टक्केच लोक असणे आवश्यक आहे तर मोकळ्या मैदानात आयोजन असेल तर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे.

याबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय की, सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांच्याकडून गरब्याला मान्यता आहे. ती मान्यता असल्याकारणाने तीन पद्धतीने गरबा खेळता येईल. ओपनमध्ये, ऑडीटोरियममध्ये आणि बंद हॉलमध्ये... जर ओपन एअरमध्ये आयोजन असेल तर सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क बंधनकारक असेल तर ऑडीटोरियमच्या 50 टक्केच लोकसंख्या असणं बंधनकारक असणार आहे. केटरिंग अथवा इतर सेवा देणाऱ्यांचे देखील दोन डोस पूर्ण होणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन राजेश टोपे यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT