Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis 
महाराष्ट्र

अंतर्गत वादातूनच सरकार कोसळणार - फडणवीस

सकाळवृत्तसेवा

ठाणे - आम्हाला महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही, महाविकास आघाडीचे सरकार हे अंतर्गत वादातूनच पडेल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी केला. आम्हाला सरकार पाडण्यापेक्षा राज्यातील १२ कोटी जनतेचे प्रश्‍न महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमवारी फडणवीस यांनी ठाण्यातील भाईंदर पाडा येथील क्वारंटाइन सेंटर व कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. राज्याच्या दृष्टिकोनातून एखादा विषय महत्त्वाचा असेल, सरकारचे अपयश झाकायचे असेल तेव्हा संजय राऊत हे कपोलकल्पित लेख लिहून विरोधक सरकार पाडण्याचे प्रयत्न करत असल्याचे लिहितात, परंतु आम्हाला सरकार पाडण्याची घाई नाही. याउलट आम्हाला राज्यातील १२ कोटी जनतेचे प्रश्‍न महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

पोलिसांच्या बदल्यांबाबत समन्वय नसल्याचे दिसून आले आहे. वास्तविक पाहता पोलिसांच्या अंतर्गत बदल्या करत असताना पोलिस आयुक्त हे गृहमंत्र्यांशी चर्चा करतात, त्यानंतर गृहमंत्र्यांनी याची माहिती मुख्यमंत्र्यांना द्यायची असते, परंतु असे काही झालेलेच दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT