Adv. Yashomati Thakur e sakal
महाराष्ट्र बातम्या

'राज्यपाल जाणीवपूर्वक राजकारण करुन महाराष्ट्रातील वातावरण खराब करतायत'

माननीय राज्यपालांनी शिष्टाचाराचा भंग केला आहे. राष्ट्रगीताचा अवमान केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या अभिभाषणाच्या वेळी सत्ताधारी पक्षांनी घोषणा दिल्या. त्यामुळे ते अभिभाषण अर्ध्यावरच सोडून गेले. तसेच कोश्यारी हे राष्ट्रगीताच्या वेळी उपस्थित नव्हते. यावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की राज्यपालांनी आपल्या घटनात्मक जबाबदारीचं वहन करायचं टाळलयं. त्यांनी घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. हे अतिशय खालच्या पातळीवरील राजकारण आहे. (Governor Bhagat Singh Koshyari Purposefully Spoil Politics Of Maharashtra, Say Yashomati Thakur)

माननीय राज्यपालांनी शिष्टाचाराचा भंग केला आहे. राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. राष्ट्रपतींनी याची गंभीर दखल घेऊन राज्यपालांना परत बोलवलं पाहिजे. राज्यपाल जाणीवपूर्वक राजकारण करुन महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत. खरं तर त्यांना राज्याच्या विकासाचा आढावा मांडणार भाषण करायचंच नव्हतं असं दिसतयं. राज्य सरकारची उपलब्धी सांगायची नव्हती. भाजपचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतायत, असा आरोप ठाकूर यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT