Governor Rejects Direct Sarpanch Election Proposal by Aghadi Sarkar 
महाराष्ट्र बातम्या

ठाकरे सरकारला पुन्हा दणका; राज्यपालांनी फेटाळला 'हा' निर्णय

वृत्तसंस्था

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि महाविकास आघाडीतलं नातं सत्तास्थापनेपासूनच चरिचेत आलं होते. आता पुन्हा एकदा राज्यपाल आणि महाविकासआघाडी सरकार यांच्यात वाद सुरू झाले आहेत. राज्य सरकारने प्रथम जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयाबाबत विरोध दर्शविला होता. तसेच सरपंच निवडण्यासाठी अध्यादेश काढावा अशी शिफारस ठाकरे सरकारने राज्यपालांकडे केली होती, हीच शिफारस आता राज्यपालांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्यपाल आणि आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा वाट पेटण्याची शक्यता आहे. 

आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी पूर्वीच्या फडणवीस सरकारचे निर्णय रद्द करण्याचा सपाटाच लावला आहे. आता तर थेट सरपंच निवडणूकाच रद्द करण्याच्या बेतात ठाकरे सरकार असल्याचे समोर आले आहे. सरपंच निवडणूक रद्द करत केवळ ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानावर सरपंच निवड व्हावी असा निर्णय महाआघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. त्यानुसार अध्यादेश जारी करण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्यात आली होती. मात्र राज्यपालांनी हा अध्यादेशच फेटाळला आहे.   

ग्रामविकास विभागाने अध्यादेश जारी करण्याबाबतचा प्रस्ताव राजभवनाला सादर केला. परंतु, राज्यपालांनी अध्यादेश काढण्यास नकार दिला आहे. अध्यादेशापेक्षा विधीमंडळात ठराव मांडण्याचा सल्ला कोश्यारींनी राज्य सरकारला दिला. अधिवेशनात विधेयक मांडून मंजूर करण्याची राज्यपालांनी घेतलेली भूमिका ग्रामविकास विभागासाठी धक्कादायक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT