Minister Gulabrao Patil
Minister Gulabrao Patil  esakal
महाराष्ट्र

Shivsena : …माझा ३३वा नंबर होता; ठाकरेंसोबत गद्दारीच्या आरोपांवर गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले

सकाळ डिजिटल टीम

सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. यादरम्यान नेहमी चर्चेत असणारे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यामागं नेमकं काय कारण होतं याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

पाटील म्हणाले की, लोकं आम्हांला गद्दारी केली, गद्दारी केली असे म्हणतात..ण माझा ३३ वा नंबर होता. माझ्या आधी ३२ जण गेले होते. आता माझ्या जागी तुम्ही बसा, जळगाव जिल्ह्यात पाच आमदार होते. पाचमध्ये चार माझ्या आधी पळून गेले. मी एकटा राहिलो.

मी आजूबाजूला नजर मारली. तर नागपूरकडे त्या ठिकाणचाही आमदार गेला, बुलडाण्यांचाही गेला. नाशिक,,ठाणे आणि दादरचाही आमदार गेला. नागपूर ते मुंबई मी एकटा राहिलो, मी काय करणार होतो, जर मी गेलो नसतो तर एवढा विकास झाला असता का? असेही त्यांनी म्हटलं.

चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? मग माझ्यावरती झाडी डोंगर खोके अशा जहीरी टीका झाली. पण मी जर चुकीचा निर्णय घेतला असता तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एवढी कामे आपल्या मतदारसंघात झाली नसती असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT