dilip walse patil esakal
महाराष्ट्र बातम्या

परमबीर सिंग बेपत्ता, गृहमंत्र्यांनी बोलवली महत्त्वाची बैठक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) अटक होण्याच्या भितीनं देश सोडून परदेशात गेले असावेत, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. कोणत्याही अधिराऱ्याला भारत सरकारच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येत नाही. त्यांना गृहमंत्रालय शोधत आहे. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणार, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे (home minister Dilip Walse Patil) पाटील यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी आता गृहमंत्री यांनी सकाळी (ता.१) प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर वळसे पाटील यांची मुंबई आणि ठाणे पोलिस आयुक्त यांच्यासोबत बैठक होणार आहे..

अटकेच्या भीतीनं देश सोडून पळाले?

अँटीलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनआयएनं परमबीर सिंह यांचा चौकशीसाठी अनेकदा समन्स जारी केलं आहे. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत ते प्राप्त झालेलं नाही. एनआयए (NIA) आणि महाराष्ट्र राज्यातील चौकशी एजन्सींना संशय आहे की, ते अटकेच्या भीतीनं देश सोडून पळाले आहेत. परमबवीर सिंग प्रकरणात राज्य सराकरने नोंदविलेले गुन्हे संदर्भात माहिती आणि पुढील कारवाई यांची चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात आली.

वळसे पाटील यांनी दोन्ही पोलीस आयुक्तांना बोलवल्याचे समजते. मुंबई पोलिस आयु्कत हेमंत नगराळे तसेच ठाणे पोलिस आयु्कत जयजित सिंग यांना बोलवले असून परमबीर सिंह प्रकरणी चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना संशय आहे की, परमबीर सिंह युरोपातील देशात लपले असावेत. मात्र, त्यासंदर्भातील पुरावा अद्याप यंत्रणांना मिळालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT