Manohar Joshi Passed Away  esakal
महाराष्ट्र बातम्या

Manohar Joshi Passed Away: बाळासाहेबांचं एक पत्र अन् मनोहर जोशींनी झटक्यात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला!

Manohar Joshi Passed Away: मुख्यमंत्री कोणीही असला तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडेच असेल, असं त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

वैष्णवी कारंजकर

Manohar Joshi Passed Away

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दाखल करण्यात आले होते. 21 फेब्रुवारी रोजी जेव्हा 86 वर्षीय मनोहर जोशी यांची प्रकृती खालावू लागली तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात नेले. आयसीयूमधील डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. शुक्रवारी पहाटे ३.०२ वाजता त्यांचे निधन झाले. मनोहर जोशी यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रति असलेल्या निष्ठेचे किस्से आजही चर्चेत आहेत.

असाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. १९९९ चा काळ होता. त्यावेळी शिवसेना-भाजपा युतीचं सरकार राज्यामध्ये होतं. खरंतर प्रादेशिक पक्षाकडे एखाद्या राज्याची सत्ता आली की त्या पक्षाचे प्रमुखच मुख्यमंत्री होतात, पण त्यावेळी असं काही नव्हतं. शिवसेना प्रमुखांनी स्वतः मुख्यमंत्री होण्याऐवजी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केलं, तर भाजपाचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते.

पण ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, तसंच मनोहर जोशी यांनीही अचानक राजीनामा दिला होता. १९९५ साली भाजपा व शिवसेना युतीचं सरकार आलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, मला ऊठ म्हटलं की उठणारा व बस म्हटलं की बसणारा मुख्यमंत्री हवा आहे. मुख्यमंत्री कोणीही झालं तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याच हाती राहणार, असंही काही ठिकाणी उल्लेख आहे.

'वर्षा-मातोश्री'मधील तणाव

युतीतील भाजपा व शिवसेनाप्रमुख यांना सांभाळत काम करताना मनोहर जोशींना संघर्ष करावा लागत होता. यामध्ये त्यांचे शिवसेनाप्रमुखांशी अधूनमधून खटकेही उडत होते. एन्रॉन प्रकल्पासाठी त्या कंपनीच्या भारतातल्या प्रमुख रिबेका मार्क जोशींना भेटायला येणार होत्या. पण त्या उशिरा आल्याने जोशींनी संतापून बैठक रद्द केली. पण त्यावेळी रिबेका या बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर चर्चा करत होत्या.

या वादाबद्दल 'जय महाराष्ट्र, हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' या प्रकाश अकोलकर यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. या घटनेतून विपरित अर्थ काढण्यात आला आणि रिबेका बाळासाहेबांना भेटल्या म्हणून मनोहर जोशी संतापले असं त्यांना सांगण्यात आलं. त्यातून वादाची ठिणगी पडली. (Latest Marathi News)

पुढे जयदेव ठाकरेंच्या घरावर छापा, रमेश किणी मृत्यू प्रकरण, भूखंडांचं आरक्षण बदलणं या सगळ्या वादग्रस्त प्रकारांमुळे मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या हालचालींना वेग आला. त्यांच्यानंतर नारायण राणे यांच्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनण्याचा प्रस्ताव ठेवला.

त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशींना राजीनामा देण्याची मागणी करणारं पत्र पाठवलं. त्यानंतर मनोहर जोशी यांनी राजीनामा दिला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले.

काय लिहिलं होतं पत्रामध्ये?

प्रिय मुख्यमंत्री,

तुम्ही आत्ता जिथे असाल, तिथे सर्वकाही थांबवा आणि तात्काळ महाराष्ट्राच्या सन्माननीय राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द करा. त्यानंतर मला भेटायला या. कृपया मला भेटायला येण्यापूर्वी तुम्ही राजीनामा दिला असल्याची खात्री करा.

(संदर्भ - BBC Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT