bachchu kadu and devendra fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu : शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील; बच्चू कडूंचा इशारा

रवींद्र देशमुख

मुंबई - राज्याच्या राजकारणात सातत्याने भूकंप होत असून आता आणखी एक भूंकप होणार असल्याच्या चर्चा आहे. शिवसेनेचे आमदार अपात्रतेबाबत लवकर निर्णय देण्याच्या निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहे. यावर आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार मुख्यमंत्री होणार? या चर्चेवर बच्चू कडू म्हणाले की, असं होऊ शकत नाही. असं झाल्यास मोठ्या प्रमाणावर भाजपला परिणाम भोगावे लागेल. याचं कारण म्हणजे, एकनाथ शिंदे यांचे देखील 5 ते 10 टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास तुमचे काही प्लॅन कामी येणार नाही, असा इशाराही बच्चू कडू यांनी भाजपाला दिला आहे.

विविध समाजांकडून करण्यात येत असलेल्या आरक्षणाच्या मागणीवर आमदार बच्चू कडू म्हणाले की, सरकारने एकदा आरक्षणाचा मुद्दा संपायला पाहिजे. तर आरक्षण विषय हा राजकीय लोकांनी केलेली जातीय व्यवस्था आहे. विकासाची व्यवस्था निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे विकासावर मते मिळू शकले नाहीत. आता निवडणुकीत आरक्षणावर मते मागितली जाणार. जातीचे मुद्दे घेऊन मते मागणार, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा कोण? मध्यरात्री अचानक मोठे फेरबदल

Latest Marathi News Live Update : राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात; कोणत्या घोषणा होणार?

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी मिळणार पीकविम्याचे २४०० कोटी; एप्रिलमध्ये सन्मान निधीचे प्रत्येकी ६००० रुपये मिळणार, वाचा...

बांधकाम कामगार नोंदणीत घोटाळा! ४ वर्षांत सोलापुरात वाढले सव्वालाख कामगार; एजंटांनी पैसे घेतले, ठरावीक ठेकेदारांनी दिली अनुभव प्रमाणपत्रे, वाचा...

ढिंग टांग : पुण्याची गणना कोण करी..? (एका भावी खासदाराची डायरी)

SCROLL FOR NEXT