15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वतंत्र्य मिळाले.  solapur
महाराष्ट्र बातम्या

स्वातंत्र्य दिन विशेष! देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सोलापुरातील ‘ही’ ५८ गावे होती पारतंत्र्यात; १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत हैदराबाद संस्थानात भोगला रझाकारांचा जाच

देशात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तरीही काही भाग हैदराबादच्या निजामाने ताब्यात ठेवला होता. यात सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावांसह मराठवाड्यातील आठ जिल्हे रझाकारांची जुलमी राजवट भोगत होते. १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद मुक्ती होईपर्यंत या ५८ गावांनी पारतंत्र्य भोगले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : देशात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तरीही काही भाग हैदराबादच्या निजामाने ताब्यात ठेवला होता. यात सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावांसह मराठवाड्यातील आठ जिल्हे रझाकारांची जुलमी राजवट भोगत होते. १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद मुक्ती होईपर्यंत या ५८ गावांनी पारतंत्र्य भोगले आहे.

स्वातंत्र्यानंतरही हैदराबादचा निजाम स्वतंत्र भारतात स्वत:चे अस्तित्व वेगळे राखण्याचे स्वप्न पाहत होता. यासाठी कासीम रझवी नावाच्या निजामाच्या दिवाणाने रझाकार नावाची स्वतंत्र संघटना स्थापन करून जनतेचा अमानुष छळ केला. यामुळे या रझाकराविरुद्ध या ५८ गावांनी मोठा प्रतिकार करत स्वत:ची फौजही तयार केली होती.

देश स्वतंत्र झाला तरही दुसरीकडे जिल्ह्याचा एक भाग मात्र स्वातंत्र्यानंतरही एक वर्षे झगडत होता. १७ सप्टेंबर १९४८ ला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या धाडसी निर्णयामुळे ‘पोलिस ॲक्शन’ द्वारे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि ही ५८ गावे सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली.

निजामशाहीतील ५८ गावे

- बार्शी तालुका : शेलगाव, श्रीपतपिंपरी, मानेगाव (थो.) भोईंजे, शेंद्री, वांगरवाडी, इर्ले, राऊळगाव, मुंगशी (वा.) सासुरे, तावरवाडी, बोरगाव.

- माढा तालुका : अंजनगाव (उ), जामगाव, केवड, चव्हाणवाडी, हटकरवाडी, कापसेवाडी, धानोरे, बुद्रूकवाडी, पंचपूलवाडी, खैराव, रिधोरे, उपळाई, सुलतानपूर.

- मोहोळ तालुका : आष्टे, पोफळी, विरवडे (खु) चिखली, यल्लमवाडी, पवारवाडी, बोपले, एकुरके, मनगोळी, भैरेवाडी, वाळूज, देगाव, घोरपडी, डिकसळ, खुनेश्वर, भोयरे, मसले-चौधरी. - उत्तर सोलापूर तालुका : भागाईवाडी, कौठाळी, साखरेवाडी, कळमण, पडसाळी, वांगी, इंचगाव, रानमसले, बीबीदारफळ, शिवणी, नान्नज, मोहितेवाडी, गरलाचीवाडी (हे गाव नेमके कोणते या उल्लेख अद्याप स्पष्ट झालेला नाही)

- दक्षिण सोलापूर तालुका : वरळेगाव.

(माहिती प्रा. सतीश कदम यांच्या संशोधनानुसार)

१७ सप्टेंबर हा दिवस देखील स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होणे आवश्यक

१५ ऑगस्टनंतर १९४७ नंतर निजामाची सत्ता खिळखिळी झाली असली तरी एक १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत हैदराबाद संस्थान मुक्त झाले नव्हते. यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्यात असलेल्या आणि मुळात मराठवाड्यात असलेल्या ५८ गावांमध्येही १५ ऑगस्टबरोबरच १७ सप्टेंबर हा दिवस देखील स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होणे आवश्यक आहे. तसा प्रशासकीय आदेश सोलापूर जिल्ह्यातील वरील ५८ गावांकरिता निघणे आवश्यक आहे. मराठवाडा मुक्तीदिनाची सुट्टी देऊन या दिवशीही ध्वजवंदन होणे आवश्यक आहे.

- डॉ सतीश कदम, हैदराबाद मुक्तिसंग्रमाचे अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2025: भारतीय संघाची विजयाने दणक्यात सुरुवात! दीप्ती शर्मा - स्नेह राणाची फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही कमाल

भीमा नदीतील पाण्यामुळे सीनेचा पूर ओसरेना! सोलापूर-विजयपूर महामार्ग आजही बंदच राहणार; उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

मोठी बातमी! ‘मकोका’ची कारवाई टाळण्यासाठी मागितली ६५ लाखांची खंडणी! कोल्हापुरातील सहायक फौजदारासह 5 जणांवर अकलूज पोलिसांत गुन्हा, दोघे अटकेत

Attacked on Ex Minister in Jail : खळबळजनक! माजी मंत्र्यावर तुरुंगात जीवघेणा हल्ला; डोक्याला गंभीर इजा!

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राची आकांशा नित्तूरे दुसऱ्या फेरीत; दिव्या भारद्वाजचीही आगेकूच

SCROLL FOR NEXT