ipl
ipl 
महाराष्ट्र

आयपीएलला पवनेचे पाणी देण्यास मनाई ! 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - आयपीएल क्रिकेटच्या पुण्यातील सामन्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. पवना नदीचे पाणी मैदानासाठी वापरण्यास न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला आज मनाई केली. मैदानासाठी सरकार करत असलेला पाणीपुरवठा बेकायदा आहे, असे खडे बोलही न्यायालयाने सुनावले. 

"लोकसत्ता मूव्हमेंट' या सामाजिक संस्थेने केलेल्या जनहित याचिकेवर आज न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्य सरकारच्या निर्णयानुसार पाणीवाटप करताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे अत्यावश्‍यक आहे. पुणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट असताना आयपीएलसाठी मैदानांना पवना नदीतून पाणीपुरवठा करू नये, अशी मागणी याचिका कर्त्यांनी केली. 

पाणीवाटपाचे धोरण निश्‍चित असतानाही मनोरंजनाचा कार्यक्रम असलेल्या आयपीएलला सरकार कसे पाणी देऊ शकते, असा सवाल न्यायालयाने केला. क्रिकेट सामन्यासाठी पवना नदीतून पाणी देण्यास न्यायालयाने असोसिएशनला मनाई केली. सरकारलाही कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आयपीएलचे चेन्नईतील सामने कावेरी वादामुळे पुण्यात होत आहेत. 

जबाबदारीने वागा ! 
राज्य सरकारकडून असोसिएशनबरोबर केलेल्या करारानुसार औद्योगिक कारणासाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे; मात्र मैदानाला पाणी देण्यात औद्योगिक उद्देश नाही, असे स्पष्ट करून न्यायालयाने सरकारकडे नाराजी व्यक्त केली. राज्यातील नद्यांच्या पाण्याचे वाटप करताना सरकारने जबाबदारीने निर्णय घ्यावा; मात्र असोसिएशनच्या मागील वर्षांच्या पाणीवाटपावरून याचा भंग झाल्याचे दिसते, अशी खरमरीत टीका न्यायालयाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT