tiger e sakal
महाराष्ट्र बातम्या

International Tiger Day 2021 : वाघ खरंच 'नरभक्षी' असतो का?

भाग्यश्री राऊत

नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून वन्यजीव आणि मानवी संघर्ष वाढला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ (Vidarbha Forest Maharashtra) या पट्ट्यात सर्वाधिक जंगल आहे. तसेच याठिकाणी वाघाची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे या भागात जवळपास दररोज वाघाने हल्ला केल्याच्या घटना घडतात. या वाघाला 'नरभक्षी' बोलले जाते. मात्र, वाघ खरंच नरभक्षी (man eater tiger) असतो का? याबाबतच आज 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त (International tiger day 2021) जाणून घेणार आहोत. (is tiger really man eater)

वाघ नरभक्षी असतो का? -

वाघ खरंच नरभक्षी असतो का? याबाबत सुनिल लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सांगतात, '' वाघाने किंवा कुठल्या वन्यप्राण्याने केलेला हल्ला हा एक अपघात असतो. कुठलाही वाघ भक्ष्य मिळवायचं म्हणून माणसाच्या मागे लागला असं अजिबात होत नाही. जोपर्यंत वाघ असेल किंवा कुठलाही प्राण्याची शारीरिक स्थिती चांगली असते तोपर्यंत तो मानवाच्या मागे लागणार नाही. वाघाचे नखं, दात नसतील तेव्हा त्याला हरिण किंवा जंगलातील इतर वन्यप्राण्यांची शिकार करता येत नाही. तसेच गुरं-ढोरं किंवा माणूस हा हरिणासारखा किंवा इतर वन्यप्राण्यासारखा वेगाने पळू शकत नाही. त्यामुळे वाघ गुरं-ढोरं किंवा गुराख्यावर हल्ला करतात. त्यामुळे लोक त्याला मॅन इटर म्हणतात. कुठलाही प्राणी हा अंगावर मुद्दाम धावून येणार नाही. वाघ दिसल्यास तो तुमच्याकडे पाहून गुरगुरेल. त्याला पळायची जागा असेल तर तो पळणारच. पळायला मार्ग नसेल तर तो हल्ला करणार. मॅन इटर या चुकीच्या संकल्पना आहेत. हे फक्त वापरले गेलेले शब्द आहेत. वाघ हा नरभक्षी नसतोच.''

सकाळच्या नागपूर कार्यालयात संवाद साधताना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये

वाघ हल्ला कधी करतो?

याबाबत लिमये सांगतात, ''वाघाच्या उंचीपेक्षा लहान व्यक्ती असेल किंवा आपण बसून कुठलंही काम करतो. त्यावेळी प्राण्याला आपण त्याचा भक्ष्य वाटतो. त्यामुळे प्रात:विधी, तेंदू अथवा मोहफुळे गोळा करतानाच अधिक हल्ले मानवावर होतात. यावेळीच वाघ हल्ला करतो. एखाद्यावेळी गुराख्याने काठी उचलल्यानंतर वाघाने त्याच्यावर हल्ला केला, असं होत नाही. वाघ शारीरिकदृष्ट्या कमजोर झाला असेल. म्हणजेच त्याचे दात किंवा नखं तुटलेले असेल, तर अशा परिस्थिती तो माणसांवर किंवा गुराढोरांवर हल्ला करण्याची शक्यता असते.''

वाघ

'तो' वाघ मृतदेहाजवळ का बसला होता? -

गेल्या काही दिवसांपूर्वी पांढरकवडा येथे वाघाने तरुणावर हल्ला केला. त्यानंतरही वाघ हा मृतदेहाजवळच बसलेला होता. मग त्याठिकाणी असं का घडलं असावं? कारण वाघ हा माणसाला घाबरलेला नव्हता. त्या वाघाने एकाला मारल्यानंतरही तो मृतदेहाजवळ बसून होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्र नागपूर येथे आणले आहे, त्याची तपासणी केली. त्यावेळी वाघ शारीरिकदृष्ट्या एकदम ठीक होता. तरीही वाघाने हा हल्ला का केला होता? असा प्रश्न होता. मात्र, त्याच्या अधिवासात माणसं-गुरंढोरं वावरताना दिसली. त्यामुळे वाघाने माणसांना घाबरणं सोडल होतं. त्यामधूनच हा हल्ला झाला असावा, असा अभ्यासातुन लक्षात येते असे ते म्हणाले . पांढरकवड्यातील त्या वाघ शारीरिक दृष्टीने सुदृढ असल्याने आता त्याला त्याच्या अधिवासात सोडणे गरजेचे आहे. त्याला दुसऱ्या जागी सोडले तर नक्कीच तो मानवी वस्तीकडे धाव घेईल. त्यामुळे तो लहानपणापासून वाढला त्याच ठिकाणी त्याला सोडणे गरजेचे आहे.

वाघाचे हल्ले कसे टाळायचे?

शेतात काम करताना दोन व्यक्तींना उभं ठेवून त्यांनी कुठं प्राणी आहे का? याकडे लक्ष ठेवावे. तसेच शेताच्या सभोवताल असणारे झुडपं जाळून टाकावी. त्यामुळे कुठं प्राणी असेल तर तो लगेच दिसेल. तसेच जंगलानजीकच्या भागात जगजागृती होणे गरजेचे आहे. वाघाला कुठल्या गोष्टी समजत नाही. त्यामुळे माणसाला समजून घेणे गरजेचे आहे. अशाप्रकारे आपण काळजी घेतली तर लगेच त्यामुळे ९० टक्के मृत्यू कमी होतील, असेही लिमये म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT