political esakal
महाराष्ट्र बातम्या

जय किसान! लोकशाहीसमोर हुकुमशाही झुकली - जयंत पाटील

आज अखेर देशातील या हुकूमशाही सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले.

सकाळ डिजिटल टीम

आज अखेर देशातील या हुकूमशाही सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले.

जवळपास ६३० शेतकऱ्यांनी बलिदान दिल्यानंतर मोदी सरकारने ३ काळे कायदे परत घेतले आहेत. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी हा निर्णय घेतला असला तरी या कायद्यांमधील तरतुदी वेगवेगळ्या मार्गांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न पुन्हा केंद्र सरकारने करू नये. देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना तीन काळे कायदे करून या देशातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गुलामगिरीत ढकलण्याचा भाजपा सरकारचा डाव होता, असा घणाघात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करत भाजपा आणि मोदी सरकारवर टीका केली आहे.

ते म्हणतात, देशाच्या पंतप्रधानांनी आज हे तीनही काळे कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मी भारतातील व महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो! देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना तीन काळे कायदे करून या देशातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गुलामगिरीत ढकलण्याचा भाजपा सरकारचा डाव होता. परंतु लोकशाहीच्या समोर आज अखेर हुकूमशाही झुकली असल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे. देशातील शेतकऱ्यांनी या विरोधात प्रामाणिपणे लढा दिला, त्यामुळेच आज अखेर देशातील या हुकूमशाही सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले. शेतकऱ्यांच्या या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या बाजूने लढत होता असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं म्हणत शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडून भाजपा आणि मोदी सरकारवर टीका होत आहे. लोकशाहीच्या समोर आज अखेर हुकूमशाही झुकली! असं ट्विट करत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT