Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

भारत-पाक सामन्यानं प्रश्न सुटणार नाही, भाजपनं काश्मीरवर बोलावं - संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

काश्मीरमध्ये कलम 370 हटवूनही परिस्थिती बदलली नाही.

काश्मीरमध्ये कलम 370 हटवूनही परिस्थिती बदलली नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठोस भूमिका घेणं आवश्यक आहे. 'काश्मीर' काय आहे हे आधी सरकारनं स्पष्ट करायला हवं? तसेच भारत-पाकिस्तान सामना खेळल्यानं प्रश्न सुटणार नाही, तर भाजपच्या नेत्यांनी काश्मीरवर बोलणं गरजेचं आहे. मोदी पाकिस्तानात जावून केक कापतात. हे भाजपच्या नेत्यांना कसं चालतं, असा सवालही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, भाजप नेत्यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावरच न बोलता पाकिस्तानवरही बोलावं. देशातील ईडी, सीबीआय पावरफुल्ल आहे, त्यामुळं त्यांना काश्मीरला पाठवा, सोबत भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी काश्मीरला पाठवलं जावं, असा घणाघातही त्यांनी भाजपच्या नेत्यांवर केला. शेवटी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचा एकरी उल्लेख केलेल्या चंद्रकांत पाटलांवरही निशाणा साधला.

ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी सांगलीतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकेरी उल्लेख केल्याचे समोर आलेय. भाजपचे महाराष्ट्रामधील एक नेते शरद पवारांचा अरे, तुरे असा एकेरी भाषेत करत होते. ही राज्याची परंपरा नाही. आम्ही अशाप्रकारे कधीही नरेंद्र मोदींचा उल्लेख करत नाही. आम्ही अमित शहांविषयी कधीही अशाप्रकारे बोललो नाही. अटलबिहारी वाजपेयी तर आमचे श्रद्धास्थानच होते आणि आहे. आम्ही आजही अडवाणींना मानतो. पण आपल्यापेक्षा वय, अनुभव, संस्कार, संस्कृतीने मोठे असलेले जी लोक आहेत, त्यांचा कायम आदर करावा. विचारांची लढाई विचारांनी लढावी, असा सल्ला वजा इशारा राऊतांनी पाटलांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Enterprises Net Loss : अदानी एंटरप्राइजेसला हजारो कोटींचा तोटा; वर्षभरातील सर्वाधिक घसरण

Ratnagiri Bridge Update : बार्जच्या धडकेनंतर म्हाप्रळ-आंबेत पुलाची स्थिती काय? अवजड वाहतूक बंद, मुंबई-पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना 60 किमीचा अतिरिक्त फेरा!

Mumbai Local: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आता हार्बर मार्गावरही धावणार १५ डब्यांची लोकल, 'या' स्थानकात मोठे बदल; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Nagpur News: खापरखेड्यात धक्कादायक चोरी! बुद्ध विहारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पितळेची मूर्ती लंपास

SCROLL FOR NEXT